काय चाललयं अवतीभवती

सोलापूर येथील निर्मला मठपती फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सोलापूरमराठी साहित्य विश्वातील सुप्रसिध्द लेखिका / कवयित्री कै. निर्मला मठपती यांच्या स्मरणार्थ फाऊंडेशनच्या विश्वस्तांनी सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार २०२५ देण्याचे योजिले आहे. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या अध्यक्षा शिवांजली स्वामी यांनी केले आहे.

दर वर्षी वेगवेगळ्या साहित्य कृतीना पुरस्कार दिला जातो. यावर्षी कथासंग्रह, कविता संग्रह, बाल कविता संग्रह / बाल कथा संग्रह या तीन साहित्य प्रकारात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२४ या दोन वर्षात प्रकाशित झालेल्या प्रत्येकी एक कथासंग्रह, कविता संग्रह, बाल कविता संग्रह / बाल कथा संग्रहास हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. पुरस्कार समारंभपूर्वक ऑक्टोबर २०२५ मध्ये दिले जाणार आहेत तरी इच्छुकांनी कथासंग्रह, कविता संग्रह, बाल कविता संग्रह/ बाल कथा संग्रह या पुस्तकाच्या प्रत्येकी दोन प्रती, स्वत:चे पासपोर्ट आकारातील छायाचित्र व अल्प परिचय ३१ जुलै २०२५ पूर्वी पाठवावा.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
यु. बी. मठपती, ब्लॉक नं. १४, कनिष्क नगर, जुळे सोलापूर, सोलापूर- ४१३००४.
मोबाईल क्र: ९८८१२१६६४८

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

9 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

14 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

23 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

24 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago