काय चाललयं अवतीभवती

अनुवादातून राष्ट्रजोडणीचा संदेश देणारे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन पुण्यात

पुणे : “विश्वव्यापी संपर्काचा खरा मंत्र म्हणजे अनुवाद” या विचाराला केंद्रस्थानी ठेवत कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने यंदाचे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन अनुवाद विषयाला समर्पित करण्यात आले आहे. सन २०१८ पासून दरवर्षी आयोजित होणाऱ्या या संमेलनाचा उद्देश सक्षम राष्ट्रनिर्मितीसाठी तरुणाईमध्ये आवश्यक वैचारिक, सांस्कृतिक व बौद्धिक गुणांचा विकास घडवणे हा आहे.

भारत हा विविध भाषा, संस्कृती आणि विचारप्रवाहांचा अनोखा संगम आहे. अशा देशात राष्ट्रजोडणीसाठी विविध भारतीय भाषांना एकमेकांशी जोडणे अत्यंत आवश्यक आहे. हे कार्य प्रभावीपणे साध्य करण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणजे भाषानुवाद. अनुवाद हा केवळ एका भाषेतून दुसऱ्या भाषेत केलेला शब्दप्रवास नसून, तो त्या-त्या प्रांतातील सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक देवाण-घेवाणीचा सशक्त पूल ठरतो, अशी भूमिका या संमेलनातून मांडली जाणार आहे.

फर्ग्युसन कॉलेजच्या फिरोदिया ऑडिटोरियममध्ये ही कार्यशाळा व संमेलन २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत तर २२ फेब्रुवारीला सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत होणार आहे.

‘अनुवादातून राष्ट्रजोडणी’ या संकल्पनेवर आधारित या संमेलनामध्ये अनुवाद क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ, अभ्यासक, लेखक व तरुण सहभागी यांच्यात वैचारिक आदान-प्रदान घडवले जाणार आहे. अनुवादाच्या तांत्रिक बाबी, बदलते माध्यमविश्व, रोजगाराच्या संधी तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सक्षम अनुवादक घडवण्यास प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या निमित्ताने विनामूल्य अनुवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सहभागासाठी इच्छुकांनी https://forms.gle/RR3xQ2Py8x1kVVz99 या लिंकद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९८६००८५११०, ९८८१३७३५८५

अनुवादाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा विचार व्यापक स्तरावर मांडणारे हे संमेलन अभ्यासक, विद्यार्थी, लेखक व भाषाप्रेमींना निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

7 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

19 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago