१. पगाराला दोनने ‘गुणले’
तरी ‘भागत’ का नाही
२. लग्नाची ‘बेडी’
नक्की कोणत्या गुन्ह्यासाठी ‘पडते’?
३. अक्कल ‘खाते’
कोणत्या बँकेत ‘उघडता’ येते?
४. ‘भाऊगर्दीत’
‘बहिणी’ नसतात का?
५. ‘बाबा’ गाडीत ‘
लहान बाळांना’ का बसवतात?
६. ‘तळहातावरचा फोड’
किती मोठा होईपर्यंत ‘जपावा’?
७. मनाचे मांडे भाजायला
‘तवा’ का लागत नाही?
८. ‘दुग्धशर्करा योग’
‘मधुमेहींना’ वर्ज असतो का?
९. ‘आटपाट’ नगर
कोणत्या ‘जिल्ह्यात’ येते?
१०. ‘तिखट प्रतिक्रिया’
‘गोड’ मानून घेता येते का?
११. सतत ‘मान खाली’ घालायला लावणारा मित्र –
‘मोबाईल’ असावा कां?
१२. ‘काहीही’
या पदार्थाची ‘रेसिपी’ मिळेल का?
१३. ‘चोरकप्पा’
नक्की’कोणासाठी’ असतो?
१४. ‘पालक’ ‘चुका’ दाखवून
मुलांना ‘माठ’ ठरवत असतात का?
१५. ‘पैशांचा पाऊस’
असेलतर ‘छत्री’ उलटी धरावी का?
१६. ‘भिंतीला’ कान असतात
तर बाकीचे अवयव कुठे असतात ?
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…