Mahatma Phule Thoughts and Work: Long Poetry Competition 2026 | Entries by September 30
राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजन
स्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2026
पुणे ः महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मदिनानिमित्त राष्ट्र सेवा दल,महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग यांच्यावतीने दीर्घ काव्य लेखन काव्य आयोजित करण्यात आली आहे. ‘फुले यांचे विचार आणि कार्य’ या विषयावर ही स्पर्धा घेण्यात येत असून 30 सप्टेंबर 2026 पर्यंत स्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन राष्ट्र सेवा दल दिवाळी अंक संपादक तथा अ.भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचे मार्गदर्शक कवी अजय कांडर यांनी केले आहे.
पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ एक हजाराची तीन पारितोषिके दिली जातील. या सर्व विजेत्यांना स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ भेट देण्यात येणार आहे. पहिल्या तीन पारितोषिक विजेत्या कविता किंवा फार दीर्घ असल्यास त्यांचा काही भाग राष्ट्र सेवा दलच्या 2026 च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे नियम असे – कविता किमान 20 पानांची असावी. त्यापेक्षा कितीही मोठी चालेल. पंधरा ते वीस ओळींच्या दरम्यान एक पान असेल असे समजावे.छंदोबद्ध कविता असेल तर पाच कडव्यात एक पान असेल असे समजावे.कवितेच्या टपालावर कवीने आपला मोबाईल नंबर स्पष्ट वाचता येईल असा लिहावा. कविता पानाच्या एकाच बाजूला, वाचता येईल अशा अक्षरात लिहून किंवा टाईप करून कुरियर किंवा पोस्टाने एका प्रतीत पाठवावी.
कविता पाठविण्याचा पत्ता :
बुद्धभूषण रवींद्र बगाडे,
द्वारा राष्ट्र सेवा दल, मध्यवर्ती कार्यालय,सिंहगड रोड,पर्वती, पुणे 411030
आनंदाची 'जीडीपी' आणि आपण ! दरवर्षी मार्च महिन्यात 'जागतिक आनंद अहवाल' जाहीर होतो,काही देश अव्वल…
महाराष्ट्राच्या भूमीपासून हजारो मैल दूर असलेल्या तंजावरच्या मातीत मराठी संस्कृतीचा दीप चारशे वर्षांहून अधिक काळ…
विशेष आर्थिक लेख अमेरिका इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा जागतिक व्यापार व अर्थव्यवस्था यावर खूपच प्रतिकूल…
गुरुकृपा लाभली की माणसाच्या बुद्धीला एक वेगळे परिमाण प्राप्त होते.पूर्वी ज्या गोष्टी गुंतागुंतीच्या वाटत होत्या…
बालमनाला आनंद देत संस्कारांची पेरणी करणाऱ्या कथा! बालसाहित्य म्हणजे केवळ बालकांचे मनोरंजन नव्हे, तर त्यांच्या…