काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रातील ५७ बोलींचा कथासंग्रह ‘माझी बोली माझी कथा’

  • ‘माझी बोली माझी कथा’ या ५७ बोलीतील कथासंग्रहात  सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील कथेचाही समावेश
  • राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध बोलींचा अभ्यास असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते डॉ. मोनिका ठक्कर यांचे ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील राजभवन येथे झाले 

 आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोली बोलल्या जातात, ज्या आज नामशेष होत चालल्या आहेत. या बाबतचा विचार करून बोलींचे जतन आणि संवर्धन व्हावे या दृष्टीने तसेच वाचकांना ते रंजक वाटावे या उद्देशाने आणि आपल्या महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या बोली याचे ज्ञान जनसामान्य, महाविद्यालय व विद्यालय स्तरावरही विद्यार्थ्यांना मिळावे, बोलींच्या अभ्यासाकडे कल वाढावा या हेतूने महाराष्ट्रातील विविध बोलीतील कथा संकलित करून सोबतच त्याचा कथासार, कठीण शब्दांचे अर्थ, त्या-त्या बोली विषयी अभ्यासपूर्ण माहिती तसेच लेखकांचा थोडक्यात परिचय अशा धाटणीचा हा ग्रंथ आहे. सदर ग्रंथात ५७ बोलीतील ५७ कथा असून प्रत्येक कथा त्या-त्या बोलीतील अभ्यासक लेखकांनी लिहिल्या आहेत. दिग्गज लेखक मंडळींनी या ग्रंथाला आपले योगदान देऊन समृद्ध केले आहे. या पुस्तकात सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील ‘झटाझोंब्या’ कथेचाही समावेश आहे. 

बोलीविषयक असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच या ग्रंथाच्या रूपाने झाला आहे. माझी बोली, माझी कथा’ असे या ग्रंथाचे नाव असून, या ग्रंथाचे प्रकाशन लोकायन प्रकाशन संस्था यांनी केले आहे.आजवर संशोधनात्मक लेखन आणि संपादन केलेल्या १२ ग्रंथांचा अनुभव पाठीशी घेऊन महाराष्ट्रातील विविध बोलीतील सदर अभ्यासपूर्ण ग्रंथाचे संकलन, संपादन आणि समन्वयाची भूमिका डॉ. मोनिका ठक्कर यांनी सांभाळली आहे. 

प्रत्येक प्रांतात बोली या विषयी अभ्यास होणे गरजेचे आहे आणि ते ग्रंथ स्वरुपात असल्यास ते पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल आणि आपल्या मातृभाषेचा सार्थ अभिमान आपण बाळगायला हवा .

रमेश बैस, राज्यपाल

बैस यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल डॉ. मोनिका ठक्कर यांचे विशेष कौतुक केले. 

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

51 minutes ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

14 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

19 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago