काय चाललयं अवतीभवती

ढगाळ वातावरणामुळे थंडी काहीशी कमी

ढगाळ वातावरणामुळे थंडी काहीशी कमी होईल असा अंदाज आहे. हवामान अंदाज जाणून घ्या निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून…

          मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कोकण व मध्य महाराष्ट्रातील (७+१०) १७ व विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात अश्या एकूण २२ जिल्ह्यात १ ते ७ जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात फक्त काही ठिकाणीच किंचित ढगाळ वातावरण राहू शकते. झालाच तर ह्या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ हलकेस्या पावसाची शक्यता जाणवते. अन्यथा नाही. मराठवाड्यात ढगाळ वातावरणासहित पावसाची शक्यता जाणवत नाही.

संपूर्ण महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे १६ डिग्री से. ग्रेड व दुपारचे कमाल तापमान ३० डिग्री से. ग्रेड  दरम्यान जाणवत असून १ ते ७ जानेवारी दरम्यान ह्याच पातळीत राहू शकतात.
ही दोन्हीही तापमाने दरवर्षी ह्या काळात नेहमीसारखी जशी असतात तशीच सरासरी तापमानाच्या पातळीत असुन त्यात विशेष चढ -उतार सध्या तरी जाणवणार नाही, असेच वाटते.

एकापाठोपाठ आदळणाऱ्या पश्चिमी झंजावातातुन गेल्या पंधरवाड्यापासून संपूर्ण उत्तर भारतात चालु असलेला धुक्याचा कहर अजूनही तेथे कायम असुन  महाराष्ट्रावर त्या वातावरणाचा विशेष असा काहीही परिणाम जाणवणार नाही, हेही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने जमेचीच बाजू समजावी, असे वाटते.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

4 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

5 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

18 hours ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

1 day ago

शेतकऱ्याचं जगणं, मरणं आणि मरणानंतरची परवड सांगणारं नाटक : ‘कर्जबळी’

शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…

1 day ago

महात्मा फुले विचार आणि कार्य या विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा Mahatma Phule Thoughts and Work Poem Competition

राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…

2 days ago