गप्पा-टप्पा

कडाक्याच्या थंडीत रोमॅन्टिक गाण्याच्या चित्रिकरणाचा अभिनय सावंतने सांगितलेला अनुभव

‘हिरा फेरी’तून अभिनयच्या अभिनयाची वेगळी छाप!’ – अभिनेता अभिनय सावंत

झकास मनोरंजनाला वेगवान तडका देत ‘हिरा फेरी’ करण्यासाठी अभिनेता अभिनय सावंत ‘अल्ट्रा झक्कास’ या मराठी ओटीटीवर लवकरच येत. महाराष्ट्राची लाडकी लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा अभिनय हा सुपुत्र. त्याने केदार शिंदे दिग्दर्शित ‘श्रीमंत दामोदर पंत’ या चित्रपटातून आपलं दमदार पदार्पण करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर ‘अकल्पित’, ‘थापाड्या’ या चित्रपटांसोबतच ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं!’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या लोकप्रिय मालिकांद्वारे प्रेक्षकांच्या मनामनात आणि घराघरात पोहचला आहे. अमोल बिडकर दिग्दर्शित आणि ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंनमेंट प्रा. लि.’चे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल निर्मित ‘हिरा फेरी’ या आगामी चित्रपटात अभिनयची केमिस्ट्री ‘बॉईज-२’ फेम अभिनेत्री शुभांगी तांबळे हिच्यासोबत जमली असून त्यासोबतच अभिनेते विजय पटवर्धन, मालवणी सम्राट दिगंबर नाईक, स्टॅंड-अप कॉमेडीस्टार प्रवीण प्रभाकर, नितीन बोधरे इत्यादी कलाकारांसोबत अभिनयची जुगलबंदी रंगणार आहे. या निमित्ताने अभिनयशी साधलेला हा खुसखुशीत संवाद त्याच्याच शब्दात…

१. तुझ्या आगामी हिरा फेरीचित्रपटाबद्दल काय सांगशील?

अभिनय सावंत –  “हिरा फेरी” हा फुल पैसा वसूल चित्रपट आहे. विनोद हा माझ्या प्रचंड जिव्हाळ्याचा विषय आहे. तो नसता तर काय झाले असते याची मी कल्पनाही करू शकत नाही. जेव्हा अमोल सरांनी मला यातील प्रमुख व्यक्तिरेखा आणि त्याचा  ऐकवली आणि या चित्रपटासाठी  जॉनर सांगितला त्या क्षणीच मी होकार दिला. मी या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली आहे. विकी असं माझ्या व्यक्तिरेखेचे नाव असून त्याने पळून जाऊन लग्न केलंय पण तो घर जावई आहे, सासरा आणि जावई यांच्यात ‘टॉम अँड जेरी’ सारखं धम्माल रिलेशन असून हे वेगळं कॉम्बिनेशन विशेष गंमतशीर आहे. विकीला स्ट्रगल न करता स्टार व्हायचंय. सहज पैसे कसे मिळविता येतील यासाठी तो काय काय उचापती करतो याचा मजेशीर प्रवास या चित्रपटात आहे. आजच्या या धावपळीच्या जीवनात हा विनोदी चित्रपट येतोय याचा मला खूप आनंद आहे.

२. चित्रीकरणादरम्यान घडलेली एखादी अविस्मरणीय घटना…?

अभिनय सावंत –   एक किस्सा मला आठवतो जो आवर्जून सांगेल की, ज्यावेळी या चित्रपटाचं चित्रीकरण चालू होतं, तेव्हा एकदम कडाक्याची थंडी होती. शुभांगीसोबत रोमँटिक गाण्याचं चित्रीकरण, आणि तेही ‘स्विमिंग पूल’ मध्ये चित्रित करायचं होतं… कोरियोग्राफर अनुपम हिंगे, पूजा काळे, खुशबू जाधव यांनी रग्गड सराव करून घेतला. पण ज्या दिवशी चित्रीकरण करायचं होतं त्या दिवशी रात्रीचं जवळजवळ १६ ते १७ डिग्रीच्या आसपास तापमान होतं. अश्या कडाक्याच्या  थंडीतील या वातावरणात आधीच सगळं युनिट गारठलेले होते. मात्र मला या थंडीत स्विमिंग पूलमध्ये वॉमअप करताना पाहून डि.ओ.पी मधू गावडा चकित झाले. त्यांनी लायटिंगसाठी माझी मदत घेतली, ती अख्खी रात्र मी थंडगार पाण्यात होतो. ही माझ्यासाठी फार खतरनाक आठवण आहे.

३.     सेटवर ‘हिरा फेरी’तील सहकलाकारांसोबत काही रंजक प्रसंग घडले होते का?

अभिनय सावंत –  या चित्रपटामध्ये एक मांत्रिक आहे. ते नितीन बोधरे या कलाकाराने केलं आहे. त्याच्या विसरभोळ्या स्वभावामुळे अनेकवेळा धम्माल येत असे, तो सेटवर असला कि संपूर्ण सेटवर हशा पिकायचा. त्याला सेटवर आम्ही सगळे फंबलकुमार म्हणायचो.

४. थेट OTT वर या चित्रपटाचा PREMIERE होतोय, तुझी काय भावना आहे?

अभिनय सावंत –  आपला प्रेक्षक वाढतोय ! चित्रपटगृहात एका तिकीटाच्या दरात एकच व्यक्ति चित्रपट बघू शकतो, पण ओटीटीमुळे एका सबस्क्रिप्शनवर संपूर्ण कुटुंब चित्रपट पाहू शकतात. एवढा मोठा प्लॅटफॉर्म “अल्ट्रा झकास मराठी ओटीटी”मुळे “हिरा फेरी” चित्रपटाला मिळालाय याचा मोठा आनंद आहे. पुढील महिन्यात या चित्रपटाचा प्रीमियर होतोय मी खूप उत्सुक आहे…

५. प्रेक्षकांनी हिरा फेरीचित्रपट का बघावा, काय सांगशील?

अभिनय सावंत –   जगातलं सगळं टेंशन विसरून खूप हसायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीने “हिरा फेरी” पहावा. आज प्रत्येक माणूस आपापल्या व्यापात – टेंशनमध्ये असतो, पण हा चित्रपट जेव्हा प्रेक्षक बघतील, तेव्हा नक्कीच त्यांच्या आयुष्यातलं हे टेंशन कमी होणार आहे, याची मला खात्री आहे. “हिरा फेरी” हे एक फुल्ल टू पैसा वसूल मनोरंजन आहे.

६.   अभिनयासोबतच विनोदाचं बाळकडू उपजत असल्याने, तुझ्याकडून प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा आहेत, काय सांगशील?

अभिनय सावंत – नक्कीच! विनोदाचे माझ्यावर गर्भ संस्कार झाले आहेत. मात्र आईकडून मी अजूनही शिकतोय, ती अख्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे आणि मी तिचा मुलगा असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप असतात, पण मी त्यांचं कुठलही ओझं न घेता, माझ्यातला अभिनेता नैसर्गिक अभिनय करण्याचा कायम प्रयत्न करीत असतो. पाहूया पल्ला खूप मोठा आहे. नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे असं मी समजतो.

( सौजन्य – राम कोंडीलकर )

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कारांची घोषणा

वैशाली पाटील, सीमा क्षीरसागर यांना शेती-पाणी पुरस्कार; चार मान्यवरांना साहित्य पुरस्कार मुंबई : यशवंतराव चव्हाण…

5 hours ago

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराची नामांकन प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता आणि अंतिम मुदत

राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्थांना संधी मुंबई :…

6 hours ago

सहाय्यक प्राध्यापक भरती पारदर्शक की पुन्हा ‘व्यक्तीनिष्ठ’? ५,००० हून अधिक पदांच्या प्रक्रियेवर संभ्रम का?

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रातील हजारो इच्छुक उमेदवारांसाठी सहाय्यक प्राध्यापक भरतीची प्रक्रिया ही आशेचा किरण ठरली…

17 hours ago

स्वतःच्या डोळ्यांनी ‘अजत्व’ कसे पाहता येते? ज्ञानेश्वरीतील गूढ संदेश काय?

ज्ञानेश्वरीतील ही ओवी साधकाला बाह्य जगाच्या धावपळीपासून अंतर्मुख शांततेकडे घेऊन जाते. ‘तैसे राहोनि ठायठिके’ म्हणताना…

19 hours ago

पुण्याच्या भूमीतून डिजिटल विश्वाला नवी दिशा ! BRICS ICT Track 2026 In Pune

पुण्याचे डिजिटल शिखर १७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुण्यात पार पडलेली 'ब्रिक्स आयसीटी…

1 day ago