रब्बी पिकाच्या पेरणीनंतर आता आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. रब्बी मका अन् ज्वारीसाठीचा पीक सल्ला…

रब्बी मका

आंतरमशागत व तण नियंत्रण

👉🏽पीक उगवत असताना पक्षी कोवळे कोंब उचलतात. परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटते. म्हणून पेरणीनंतर सुरुवातीच्या दहा ते बारा दिवसांपर्यंत पिकाची पक्ष्यांपासून राखण करणे महत्वाचे आहे. तसेच पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात. म्हणून अशावेळी देखील पक्षी राखण गरजेची असते.
👉🏽मका उगवणीनंतर आठ ते दहा दिवसांनी एका चौफुल्यावर एकच जोमदार रोप ठेवून विरळणी करावी. गरज भासल्यास उगवणीनंतर त्वरित नांग्या भराव्यात.
👉🏽मक्याची रोपावस्था ज्यादा पाणी किंवा दलदलीच्या स्थितीस अत्यंत संवेदनशील आहे. म्हणून पेरणीनंतरच्या सुरुवातीच्या वीस दिवसांपर्यंतच्या काळात पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
👉🏽तणांच्या प्रादुर्भावानुसार पीकवाढीच्या सुरवातीच्या काळात एक ते दोन खुरपण्या करून ताटांना आधारासाठी माती चढवावी. गरजेनुसार एक ते दोन कोळपण्या कराव्यात.
👉🏽वाढती मजुरी किंवा अन्य कारणाने कोळपणी करणे शक्य नसल्यास, पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपूर्वी चांगल्या वाफशावर अट्रॅझीन (५० डब्ल्यूपी) १.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर सम प्रमाणात फवारावे.
अन्यथा पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी हॅलोसल्फुरॉन मिथाईल (७५ डब्ल्यूपी) ०.२४ ग्रॅम किंवा पीक ३० ते ४० दिवसांचे असताना टेम्बोट्रायॉन (३४.४ एससी) ०.६ मि.लि. किंवा टोप्रामेझॉन (३३.६ एससी) ०.१५ मि.लि. प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
तणनाशक फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे.
तणनाशकांचा वापर करण्यापूर्वी पीक पद्धती, तणांचा तसेच जमिनीचा प्रकार व हवामानानुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

रब्बी ज्वारी

पेरणीनंतरचे ओलावा व्यवस्थापन

👉🏽कोरडवाहू रब्बी ज्वारीस संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी पाणी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे.
👉🏽बागायती रब्बी ज्वारीस मध्यम जमिनीत पाणी देण्याच्या अवस्था
पीक गर्भावस्थेत असताना (पेरणीनंतर २८ ते ३०दिवसांनी),
पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी),
पीक फुलोऱ्यात असताना ( पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी),
कणसांत दाणे भरताना पेरणीनंतर ( ९० ते ९५ दिवसांनी)
मात्र, भारी जमिनीत बागायती ज्वारीस चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

10 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

11 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

20 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

20 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

1 day ago