संशोधन आणि तंत्रज्ञान

वर्क-लाइफ बॅलन्स नव्हे, हे तर ‘अटेन्शन मॅनेजमेंट’ !

प्रथमेश पालवे यांचे ‘रिमोट वर्किंग’वर खुमासदार भाष्य

कोल्हापूर: “घरातून काम करताना आपण खरंच घरी असतो का ? लॅपटॉप बंद झाला तरी डोके मात्र कामातच सुरू असते. हा आजच्या रिमोट वर्करचा सर्वात मोठा प्रश्न आहे,” अशा शब्दांत प्रथमेश पालवे यांनी आयटी क्षेत्रातील तरुणांच्या बदलत्या जीवनशैलीवर प्रकाश टाकला. वर्डकॅम्प कोल्हापूर (WordCamp Kolhapur) अंतर्गत आयोजित व्याख्यानात त्यांनी ‘रिमोट वर्किंग’ मधील गंमतीजमती आणि त्यातील आव्हानांवर खुमासदार शैलीत भाष्य केले.

अटेन्शन मॅनेजमेंटची गरज व्याख्याना दरम्यान पालवे यांनी सांगितले की, वर्क-लाइफ बॅलन्स म्हणजे केवळ वेळेचे नियोजन (Time Management) नसून ते ‘अटेन्शन मॅनेजमेंट’ (Attention Management) आहे. रिमोट वर्किंगमध्ये माणूस घरी असूनही कामाच्या टेन्शनमुळे कुटुंबात मानसिकरीत्या उपस्थित नसतो. “ना इकडे ना तिकडे, अशा गिल्टमध्ये आजचा तरुण अडकला आहे,” असेही ते म्हणाले.

रिमोट वर्किंगमधील ‘दिवास्वप्न’ आणि वास्तव सकाळी ५ वाजता उठून काम करण्याच्या ‘मोटिवेशनल रिल्स’च्या प्रभावाबद्दल बोलताना पालवे यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. सोशल मीडियावरील मोटिवेशन पाहून सुरुवातीचे काही दिवस उत्साहात काम होते, पण नंतर पुन्हा तोच दिनक्रम सुरू होतो. रात्री उशिरापर्यंत जागणे, मॅगी किंवा पिझ्झा खाऊन भूक भागवणे आणि दुपारी १२ वाजेपर्यंत झोपणे यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिस्त (Discipline) महत्त्वाची मोटिवेशन हे पाहुण्यासारखे असते, ते येते आणि जाते; पण शिस्त (Discipline) ही घरातील माणसासारखी असावी लागते, जी तुमच्याकडून सातत्याने काम करून घेते. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी स्वतःला एका साच्यात बसवणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात ‘बर्न आऊट’ (Burnout) सारख्या समस्या उद्भवणार नाहीत, असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

छंद जोपासा, ताण घालवा केवळ कोडिंग किंवा तांत्रिक कामात न अडकता स्वतःचा आनंद जपण्यासाठी एखादा छंद जोपासणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगताना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची उदाहरणे दिली. कुणी व्हायोलिन शिकतेय तर कुणाला कवितांची आवड आहे. अशा छंदांमुळे कामाचा ताण कमी होण्यास मदत होते.

या व्याख्यानातून प्रथमेश पालवे यांनी रिमोट वर्क करणाऱ्या प्रोफेशनल्सना वेळेचे पालन करणे, घरच्यांशी संवाद साधणे आणि आरोग्याची काळजी घेणे किती अनिवार्य आहे, याचा वस्तुपाठच मांडला.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

11 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

24 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago