काय चाललयं अवतीभवती

बोढेकर यांच्या अंतर मंतर चारोळी संग्रहाचे प्रकाशन

दानापूर (जि. अकोला) येथे आयोजित आठव्या मराठी बोली साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या अंतर- मंतर या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष आचार्य ना. गो. थुटे ( वरोरा), स्वागताध्यक्ष अनिल गावंडे, मराठी बोली साहित्य मंडळाचे संस्थापक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, संमेलनाचे उद्घाटक राजेंद्र घोरपडे, मालवणी बोलीचे अभ्यासक डॉ. बाळकृष्ण लळीत (नगर), ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले (दानापूर), डॉ. रावसाहेब काळे (अकोला), झाडीपट्टीची बहिणाबाई अंजनाबाई खुणे , डॉ. अजय विखे, दैनिक अजिंक्य भारतचे पुरूषोत्तम आवारे , ज्येष्ठ सप्तखंजेरीवादक भाऊ थुटे आदी उपस्थित होते.

चारोळी संग्रहाबद्दल बोलताना आचार्य थुटे म्हणाले, बोढेकर यांनी चारोळी या काव्यविद्येचा अभ्यास करून त्यांनी स्विकारलेल्या विचारधानेनुसार चांगल्याचा प्रचार व वांगल्यासाठी नकार नोंदविला आहे. यामधून समाजमन सद् भावनेने समृद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यांनी चारोळी या लोकप्रिय माध्यमातून लोकांच्या अंतरात संस्कारात्मक मंत्राची पेरणी केली आहे. ते मानवी जीवनावर विविध अंगांनी अभिव्यक्त झाले आहेत. मानवीय अंतरंगामध्ये अंतर पडू नये यासाठीच त्यांनी आपल्या चारोळ्यातून मंत्रबोध केलेला आहे. प्रत्येकांनी विकारांवर मात करून जग सुंदर करण्याचीच त्यांची अभिलाषा प्रकट झाली आहे. ते पेशाने शिक्षक असल्याने त्यांचे शिक्षकत्व या संग्रहात प्रतिबिंबीत झाले आहे. त्यांचा विशाल जीवनानुभव व त्यांना जाणवलेले वास्तव याची प्रचिती वाचकांना कळून येते असेही थुटे म्हणाले.

अंतर-मंतरमध्ये 192 चारोळ्या आहेत. या काव्यकलेतून कवीने आपल्या अनुभूतीतला अनेकांगी आशय व्यक्त केला आहे. संताचे बोधामृत, सज्जनता, देव-धर्म, अध्यात्म, ग्रामसंस्कृती, राजकारण, सुसंस्कार, वर्तनविकृती, निसर्ग, म्हातारपण, घरसंसार, व्यसने, वैज्ञानिकता, साहित्य भाषा, शिक्षण, ऐतिहासिक पौराणिक व्यक्तींचे दाखले व अन्य गोष्टींनी भरगच्च भरलेला हा चारोळीसंग्रह आहे.

ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे यापुर्वी झाडीकविता संग्रह, लेखसंग्रह, इंग्रजी अनुवादित ग्रंथ, झाडीपट्टी विषयक वैचारिक लेखन प्रसिद्ध आहे. विविध दैनिकात त्यांचे स्तंभलेखन, स्फुट लेखन प्रसिद्ध झाले आहे. जनप्रबोधनाच्या माध्यमातून ते व्यवसाय शिक्षण, ग्रामगीता विचार दर्शन, व्यसनमुक्तीपर कार्य ते करीत असतात.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

3 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

15 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago