काय चाललयं अवतीभवती

सावधान ! मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम सुरु

🐊मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम सुरू आहे.🐊

गेल्या चौदा वर्षात मगरीचे हल्ले झालेल्या नोंदी पाहता , मगरीने तिच्या अधिवासात धोका निर्माण झाल्यामुळे हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी मगरींच्या विणीच्या आणि संगोपनाच्या हा कालावधीत त्यांच्या अधिवासाला धोका पोहोचेल अशी कोणतीही कृती करू नये.

– अजितकुमार पाटील

सांगली

मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम काळात मोठ्या मगरी ह्या आक्रमक असतात. आपल्या पिल्लांवर/प्रजातीवर धोका निर्माण होऊ नये म्हणून तिच्या अधिवासात येणाऱ्या प्रत्येकावर या मगरी हल्ला करतात. त्यामुळे प्राण्यांवर तसेच मानवावर जीवघेणे हल्ले मगरींकडून या कालावधीत होताना पाहायला मिळते. तरी सर्व नागरिकांना या कालावधीत नदी परिसरात काम करत असताना योग्य ती काळजी घ्यावी. नदी पात्रात खोल पाण्यात उतरणे, कपडे धुणे, पोहणे, पाण्यात उतरून अंघोळ करणे तसेच खोल पाण्यात / पाण्याजवळ जनावरे घेऊन जाणे टाळावे. नदी पत्राचा वापर काळजी घेऊन करावा.

नदी पत्रात मगरीचा वावर दिसत असेल तर पाण्यात जाणे टाळावे. जनावरांना पाणी पाजताना पाण्या काठी कमी उथळ जागेत घेऊन जावे. खोल पाण्यात उतरून कपडे धुणे टाळावे. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांवर मागरीचे हल्ले झालेले आढळतात. त्यामुळे लहान मुलांना पाण्यात सोडू नये. विध्यार्थ्यांची परीक्षा संपत आल्या आहेत व उन्हाळी सुट्टी सुरू होत आहे, तरी पालकांनी मुलांना नदीवर पोहण्यास पाठवू नये जेणेकरून लहान मुलांच्या जिवितास धोका निर्माण होणार नाही.

जाणून घ्या मगरीचे आचरण

मगर ही पाण्यात वावरते व जमिनीवर राहते ; जमिनीवर माती उकरून अंडी घालते व घरट्याचे संगोपन करते. एक ते दीड महिन्यात घरट्यातील अंड्यातून मगरीची पिल्ले जन्मतात व अन्नासाठी पाण्यात उतरतात. मगर ही पिल्लांना शिकार करून अन्न भरवत नाही किंवा दूध पाजत नाही तर मगरीची लहान पिल्ले पाण्यात उतरून कीटक तसेच लहान मासे खाऊन मोठी होतात. मगरींना रोजचे खाद्य हे फार कमी प्रमाणात लागत असलेने ते इतर प्राण्यांप्रमाणे शिकार करून साठवून ठेवत नाहीत. म्हणूनच मगर ही मोठया प्राण्यांची शिकार करतांना आपल्या भागात आढळत नाही.

गेल्या चौदा वर्षात मगरीचे हल्ले झालेल्या नोंदी पाहता , मगरीने तिच्या अधिवासात धोका निर्माण झाल्यामुळे हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी मगरींच्या विणीच्या आणि संगोपनाच्या हा कालावधीत त्यांच्या अधिवासाला धोका पोहोचेल अशी कोणतीही कृती करू नये.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

6 hours ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

12 hours ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

1 day ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

2 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

3 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

3 days ago