काय चाललयं अवतीभवती

सावधान ! मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम सुरु

🐊मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम सुरू आहे.🐊

गेल्या चौदा वर्षात मगरीचे हल्ले झालेल्या नोंदी पाहता , मगरीने तिच्या अधिवासात धोका निर्माण झाल्यामुळे हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी मगरींच्या विणीच्या आणि संगोपनाच्या हा कालावधीत त्यांच्या अधिवासाला धोका पोहोचेल अशी कोणतीही कृती करू नये.

– अजितकुमार पाटील

सांगली

मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम काळात मोठ्या मगरी ह्या आक्रमक असतात. आपल्या पिल्लांवर/प्रजातीवर धोका निर्माण होऊ नये म्हणून तिच्या अधिवासात येणाऱ्या प्रत्येकावर या मगरी हल्ला करतात. त्यामुळे प्राण्यांवर तसेच मानवावर जीवघेणे हल्ले मगरींकडून या कालावधीत होताना पाहायला मिळते. तरी सर्व नागरिकांना या कालावधीत नदी परिसरात काम करत असताना योग्य ती काळजी घ्यावी. नदी पात्रात खोल पाण्यात उतरणे, कपडे धुणे, पोहणे, पाण्यात उतरून अंघोळ करणे तसेच खोल पाण्यात / पाण्याजवळ जनावरे घेऊन जाणे टाळावे. नदी पत्राचा वापर काळजी घेऊन करावा.

नदी पत्रात मगरीचा वावर दिसत असेल तर पाण्यात जाणे टाळावे. जनावरांना पाणी पाजताना पाण्या काठी कमी उथळ जागेत घेऊन जावे. खोल पाण्यात उतरून कपडे धुणे टाळावे. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांवर मागरीचे हल्ले झालेले आढळतात. त्यामुळे लहान मुलांना पाण्यात सोडू नये. विध्यार्थ्यांची परीक्षा संपत आल्या आहेत व उन्हाळी सुट्टी सुरू होत आहे, तरी पालकांनी मुलांना नदीवर पोहण्यास पाठवू नये जेणेकरून लहान मुलांच्या जिवितास धोका निर्माण होणार नाही.

जाणून घ्या मगरीचे आचरण

मगर ही पाण्यात वावरते व जमिनीवर राहते ; जमिनीवर माती उकरून अंडी घालते व घरट्याचे संगोपन करते. एक ते दीड महिन्यात घरट्यातील अंड्यातून मगरीची पिल्ले जन्मतात व अन्नासाठी पाण्यात उतरतात. मगर ही पिल्लांना शिकार करून अन्न भरवत नाही किंवा दूध पाजत नाही तर मगरीची लहान पिल्ले पाण्यात उतरून कीटक तसेच लहान मासे खाऊन मोठी होतात. मगरींना रोजचे खाद्य हे फार कमी प्रमाणात लागत असलेने ते इतर प्राण्यांप्रमाणे शिकार करून साठवून ठेवत नाहीत. म्हणूनच मगर ही मोठया प्राण्यांची शिकार करतांना आपल्या भागात आढळत नाही.

गेल्या चौदा वर्षात मगरीचे हल्ले झालेल्या नोंदी पाहता , मगरीने तिच्या अधिवासात धोका निर्माण झाल्यामुळे हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी मगरींच्या विणीच्या आणि संगोपनाच्या हा कालावधीत त्यांच्या अधिवासाला धोका पोहोचेल अशी कोणतीही कृती करू नये.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

साखर ७० रुपयांवर ! सरकारचे नियोजन कुठे चुकले ? : विजय जावंधिया यांचे स्पष्ट मत

देशात साखरेच्या दराने अचानक उसळी घेत काही भागांत प्रतिकिलो ७० रुपयांचा टप्पा गाठला आहे. साखरेचे…

21 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया यांचे पत्र; काय मागणी आहे या पत्रात ?

खतावरील सबसिडी बंद करा,शेतमालाला योग्य भाव द्या! केंद्र सरकारला शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया यांचे पत्र;…

1 day ago

पल्लवीत दडले फूल-फळाचे रहस्य; पण संपूर्ण वृक्षाचे मूळ कुठे?

विशाल वृक्षाचे रहस्य एवढ्याशा बीजात कसे सामावलेले असते? एका छोट्याशा बीजात उद्याचा विशाल वृक्ष दडलेला…

1 day ago

हळदीचे कंद सडतायत, पीक मरतंय? कारणे ओळखा, वेळीच करा प्रभावी व्यवस्थापन ! Turmeric Rhizome Rot and Wilt

हळद पिकातील कंद सड व मर : कारणे, लक्षणे आणि प्रभावी व्यवस्थापन हळद आणि अद्रक…

3 days ago

सृष्टी निर्माण झाली कशी? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले गूढ काय?

सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…

4 days ago

सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत: डॉ. श्रीपाल सबनीस

कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…

4 days ago