Residue free farm Production book by Mandar Mundale
सध्या आरोग्यदायी, विषमुक्त शेतमाल विषयाचे महत्व वाढते आहे. अशा उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी आहे. अन्न सुरक्षितता (फूड सेफ्टी) हा विषय संपूर्ण जगाच्या अजेंड्यावर आहे. कोरोना संकटानंतर तर जागतिक अर्थकारणच ढवळून गेले आहे. जगभरातील ग्राहक कधी नव्हे एवढा सुदृढ आरोग्य, प्रतिकारशक्ती व सकस अन्न याबाबत काटेकोर झाला आहे. त्यामुळे रासायनिक अवशेषमुक्त अन्नाला जगभर मागणी वाढत राहणार हे उघड आहे. भारताने ग्रेपनेटबरोबर अनारनेट, व्हेजनेट आदी विविध पिकांसाठी ट्रेसेबिलीटी यंत्रणा तयार करून रासायनिक अवशेषमुक्त शेतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे.
भारताला आदर्श शेती पध्दती (गूड ॲग्रीकल्चरल प्रॅक्टीसेस) व ट्रेसेबिलिटी यांची सांगड घालून जागतिक बाजारपेठेत मोठा हिस्सा मिळवण्याची संधी आहे. पण यासाठी रेसिड्यु फ्री शेती उत्पादन घेणे महत्त्वाचे आहे. यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरावे या उद्देशाने सकाळ- ॲग्रोवन दैनिकाचे उपमुख्य उपसंपादक मंदार मुंडले यांनी `रासायनिक असो वा सेंद्रिय, शेती रेसिड्यू फ्रीच` हे पुस्तक लिहीले आहे.
सकाळ प्रकाशनतर्फे प्रकाशित या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, ॲॅग्रोवनचे संपादक संचालक आदीनाथ चव्हाण व कृषी विभागाच्या निर्यात कक्षाचे सल्लागार व तज्ज्ञ गोविंद हांडे यांच्या हस्ते झाले. शेतकरी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी व पणन, अन्य विभागाचे अधिकारी, खाजगी कंपन्या, कृषी सेवा केंद्रे, अभ्यासक, प्रमाणीकरण अधिकारी, निर्यातदार आदी सर्वांना उपयोगी ठरावे असे हे पुस्तक आहे. केवळ पुस्तकी वा थेअरॉटीकल ज्ञान नाही तर प्रॅक्टीकली ज्ञानावर आधारीत माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
‘रेसिड्यू फ्री’ शेती करताना लेबलक्लेम, पीएचआय, एमआरएल याबाबी महत्त्वाच्या आहेत. द्राक्षात याबाबत मोठे काम झाले आहेत. मात्र हा विषय व्यापक असून द्राक्षाप्रमाणेच अन्य पिकासाठीही असे संशोधन होणे गरजेचे आहे. आपली शेती अधिक व्यावसायिक, अधिक उत्पादनक्षम आणि विषमुक्त कशा प्रकारे राहील यासाठी प्रयत्न करत राहावे लागणार आहे. पुस्तकांत याविषयाची दिलेली मूलभूत माहिती शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल.
कुलगुरु,
– डॉ. एस. डी. सावंत
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
जगात अमेरिका, कॅनडा या देशांत रासायनिक घटकांचा वापर अधिक आहे, परंतु तेथील उत्पादनात उर्वरित अंशाचे प्रमाण कमी आहे. या तुलनेत भारतात रासायनिक घटकांचा वापर कमी असला, तरी उर्वरित अंशाचे प्रमाण खूप अधिक आहे. यामुळे रेसिड्यू फ्री शेतीचे महत्त्व वाढले आहे. या आनुषंगिक पुस्तकात चांगली माहिती दिली आहे.– गोविंद हांडे
कृषी निर्यात सल्लागार
जगाला सकस अन्न पुरवताना शेतकऱ्याला आपल्या कुटुंबाचे आरोग्यही जपायचे आहे. शेतीतील नवी पिढी अधिक महत्वाकांक्षी आहे. या तरूणाईला ज्ञानाची भूक आहे. मार्गदर्शनासह त्यांना प्रोत्साहन व धीर देण्याची गरज आहे. रासायनिक अवशेषमुक्त शेतीत योग्य सल्लागार व त्यातही या विषयाला वाहिलेल्या साहित्याची संख्या तुलनेने कमी आहे. अशावेळी रासायनिक असो वा सेंद्रिय, शेती रेसिड्यू फ्रीच’ हे पुस्तक मार्गदर्शक म्हणून कायमस्वरूपी साथ देईल अशी मला खात्री आहे.
– आदीनाथ चव्हाण
संपादक, ॲग्रोवन
पुस्तकाचे नाव – रासायनिक असो वा सेंद्रिय, शेती रेसिड्यू फ्रीच’
लेखक – मंदार मुंडले
प्रकाशक – सकाळ प्रकाशन
पृष्ठे – ३५२ किंमत – 500 रुपये ( सवलतीचा दर पोस्टल खर्चासह – 485 रुपये )
पुस्तकासाठी संपर्क – 9881307294 (व्हाट्सअॅप)
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…