Alsand Marathi Sahitya Samhelan
आळसंद ( ता. खानापूर ) येथील स्व. श्रीमंत खानाजीराव जाधव दिशा, साहित्य, संस्कृती, कला प्रतिष्ठान यांच्यावतीने सोमवारी ( ता. २२ ) सकाळी पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द साहित्यिक, राज्य साहित्य, सांस्कृतिक मंडळाचे सदस्य डॉ. प्रा. रणधीर शिंदे ( कोल्हापूर ) यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होणार आहे, अशी माहिती संयोजक संग्राम जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले, आळसंद नगरीत सकाळी ९ वाजता सिध्दनाथ मंदिरापासून ग्रंथ दिंडी निघणार आहे. यामध्ये टाळ, मृदुंगांचा गजर, वारकरी वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. कवयित्री अपर्णा पाटील ( कोल्हापूर ) स्वागताध्यक्ष आहेत. सरपंच अभिनंदन जाधव , सुभाष पाटील , धर्मेंद्र पवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
ते म्हणाले, दुसऱ्या सत्रात गझलकार सुधीर इनामदार ( आटपाडी) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. यावेळी महेश कोष्टी , सुनिल दबडे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, रघुराज मेटकरी , एकनाथ गायकवाड प्रमुख उपस्थित आहेत.
अशोकराव देशमुख, खंडेराव जाधव , प्रा. विश्वनाथ गायकवाड, रत्नकुमार नरुले , विनोद जाधव , दीपक पवार , गणेश शेटे , शरद माळी , रमेश कोष्टी , दीपक सावंत हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…
स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…