काय चाललयं अवतीभवती

अनुसया जाधव स्मृती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

नांदेड येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र यापैकी एका साहित्यकृतीस हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख व मानपत्र असे आहे, अशी माहिती डॉ. माधव जाधव यांनी दिली आहे.

१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र या पुरस्कारासाठी पात्र असतील. या वाङ्मयप्रकारातील पहिल्या साहित्यकृतीची प्रथम आवृत्ती या पुरस्कारासाठी पाठवावी. साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख १० मे २०२४ अशी असून अधिक माहितीसाठी ९४२३४३९९९१, ९६५७४७८८४४ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता:
संयोजक, अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार, द्वारा डॉ. माधव जाधव, ०६, कुळवाडी साई नगरी, तरोडा पोस्ट ऑफिस, काबरा नगर जवळ, वाडी (बु.), नांदेड – ४३१ ६०५ भ्र.: ९४२३४३९९९१, ९६५७४७८८४४

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

47 minutes ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

14 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

19 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago