Call for submission of books for Tilganga Sahitya Award 2024
सांगली – कादंबरी, कथा, कवितासंग्रहासाठी तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार व ललित, प्रवासवर्णन, आत्मचरित्र यासाठी तिळगंगा प्रतिभा पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी प्रथम प्रकाशित पुस्तक पाठवण्याचे आवाहन संयोजक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन आणि साहित्यिक व सांगीतिक उपक्रम घेण्यात येतो. तिळगंगा साहित्यरंग परिवार, संगीतरत्न कै. ग. रा. पाटील (तात्या) संगीत मंच आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, पेठ यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात येते. यामध्ये साहित्य लेखनास प्रेरणा मिळावी या उद्देशाने प्रथम प्रकाशित कवितासंग्रह, कथासंग्रह आणि कादंबरीसाठी कवी, गझलकार विनायक गणपतराव कुलकर्णी, सांगली पुरस्कृत, स्व. गणपतराव शंकरराव कुलकर्णी ( तात्या ) जवळेकर स्मृती ‘तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार’ देण्यात येतो. तर ललितसंग्रह / प्रवासवर्णन/ आत्मचरित्रपर पहिल्या पुस्तकासाठी प्रतिभा बुक्स, इस्लामपूर पुरस्कृत, स्व. बाळासाहेब पाटील स्मृती तिळगंगा – प्रतिभा पुरस्कार ‘ देण्यात येतो.
यासाठी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी व ललित/ प्रवासवर्णन /आत्मचरित्र ग्रंथ पाठविण्यात यावेत. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि पुस्तकभेट असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तरी लेखक किंवा प्रकाशकांनी पुस्तकाच्या दोन प्रती, अल्पपरिचय व फोटोसह ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवाव्यात.
मान्यवर साहित्यिकांच्या परीक्षणातून या पुरस्काराची निवड करण्यात येणार असून हे पुरस्कार नोव्हेंबर २०२४ मध्ये होणाऱ्या सातव्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता – ‘ श्री. धर्मवीर पाटील, द्वारा : प्रतिभा बुक्स, नगरपालिका कॉम्प्लेक्स, काळा मारुती चौक, इस्लामपूर जि. सांगली ४१५४०९ संपर्क : ८४५९०७७१८२
अधिक माहितीसाठी संपर्क : आनंदहरी ८२७५१७८०९९
जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…