April 27, 2026
Call for submission of books for Tilganga Sahitya Award 2024
Home » तिळगंगा साहित्य पुरस्कार २०२४ साठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

तिळगंगा साहित्य पुरस्कार २०२४ साठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सांगली – कादंबरी, कथा, कवितासंग्रहासाठी तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार व ललित, प्रवासवर्णन, आत्मचरित्र यासाठी तिळगंगा प्रतिभा पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी प्रथम प्रकाशित पुस्तक पाठवण्याचे आवाहन संयोजक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन आणि साहित्यिक व सांगीतिक उपक्रम घेण्यात येतो. तिळगंगा साहित्यरंग परिवार, संगीतरत्न कै. ग. रा. पाटील (तात्या) संगीत मंच आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, पेठ यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात येते. यामध्ये साहित्य लेखनास प्रेरणा मिळावी या उद्देशाने प्रथम प्रकाशित कवितासंग्रह, कथासंग्रह आणि कादंबरीसाठी कवी, गझलकार विनायक गणपतराव कुलकर्णी, सांगली पुरस्कृत, स्व. गणपतराव शंकरराव कुलकर्णी ( तात्या ) जवळेकर स्मृती ‘तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार’ देण्यात येतो. तर ललितसंग्रह / प्रवासवर्णन/ आत्मचरित्रपर पहिल्या पुस्तकासाठी प्रतिभा बुक्स, इस्लामपूर पुरस्कृत, स्व. बाळासाहेब पाटील स्मृती तिळगंगा – प्रतिभा पुरस्कार ‘ देण्यात येतो.

यासाठी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी व ललित/ प्रवासवर्णन /आत्मचरित्र ग्रंथ पाठविण्यात यावेत. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि पुस्तकभेट असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तरी लेखक किंवा प्रकाशकांनी पुस्तकाच्या दोन प्रती, अल्पपरिचय व फोटोसह ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवाव्यात.

मान्यवर साहित्यिकांच्या परीक्षणातून या पुरस्काराची निवड करण्यात येणार असून हे पुरस्कार नोव्हेंबर २०२४ मध्ये होणाऱ्या सातव्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता – ‘ श्री. धर्मवीर पाटील, द्वारा : प्रतिभा बुक्स, नगरपालिका कॉम्प्लेक्स, काळा मारुती चौक, इस्लामपूर जि. सांगली ४१५४०९ संपर्क : ८४५९०७७१८२
अधिक माहितीसाठी संपर्क : आनंदहरी ८२७५१७८०९९

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

शिव बाल-किशोर युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ. श्रीकांत पाटील

Weather Forecast : ढगाळ वातावरण, मध्यम पावसाची शक्यता

गाव आणि शहरातील जीवनात असलेला भेद एका छोट्या मुलाच्या नजरेतून…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!