chance-of-rain-hail-followed-by-cold
आजपासून पाच दिवस म्हणजे मंगळवार १० जानेवारी पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळलेले वातावरण राहून तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ गडगडाटीसह अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.
विशेषतः खान्देश व लगतच्या नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापुर जिल्ह्यात मंगळवारी ९ तारखेला पावसाची ही शक्यता अधिक जाणवते.
तर ह्या एके दिवशी केवळ ९ तारखेला पश्चिम मध्यप्रदेश उपविभागाबरोबरच महाराष्ट्रातील लगतच्या खान्देशातील शिरपूर शहादा चोपडा यावल रावेर तालुक्याच्या तुरळक भागात झालीच तर तुरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही.
११ जानेवारीनंतर थंडीची शक्यता
ढगाळ व पावसाळी वातावरण ओसंरल्यानंतर म्हणजे गुरुवार दि.११ जानेवारी, अमावस्येपासून, उत्तर भारतातून उत्तर व ईशान्य दिशेकडून थंड कोरडे वारे घुसण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात पुन्हा थंडीची शक्यता जाणवते.
७ ते १० जानेवारीपर्यन्तच्या ४दिवसात महाराष्ट्रात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १६ डिग्री से.ग्रेड(म्हणजे सरासरीपेक्षा ४ डिग्रीने अधिक) व दुपारचे कमाल तापमान २८ डिग्री से. ग्रेड(म्हणजे सरासरीइतके) दरम्यानचे असु शकते, असे वाटते.
सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…