कविता

कोरड्या मातीचे वर्तमान बदलावे म्हणून…

उपाशी चिमणीचा
खोल आवाज
केळीच्या पानासारखा
चिरत जातो जिवाला
अशावेळी
भयव्याकुळ वाऱ्याची पावलं
शोधू लागतात
मातीच्या हातावरील
कोंभ

काळोखाच्या मिठीतल्या
भयभीत
पायवाटांसाठी
जागत राहतात
चंद्राच्या पापण्या …

ऋतुंच्या फुटव्यासाठी
स्वप्नांचे रुजवे
घालायला हवेत
हा धीर जगवत राहतो
रोपारोपाला…

युगांतराच्या प्रतीक्षेत
टिकून राहतात
पारंब्या
मातीचे बोट धरुन…

दिवसाच्या रिंगणात
कुणी तरी कुठे तरी
घालत राहते पाणी
वांझोट्या नात्यांना…

कोरड्या मातीचे
वर्तमान
बदलावे म्हणून ….

सौ.मनीषा पाटील
देशिंग-हरोली

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

स्वतःच्या डोळ्यांनी ‘अजत्व’ कसे पाहता येते? ज्ञानेश्वरीतील गूढ संदेश काय?

ज्ञानेश्वरीतील ही ओवी साधकाला बाह्य जगाच्या धावपळीपासून अंतर्मुख शांततेकडे घेऊन जाते. ‘तैसे राहोनि ठायठिके’ म्हणताना…

2 hours ago

पुण्याच्या भूमीतून डिजिटल विश्वाला नवी दिशा ! BRICS ICT Track 2026 In Pune

पुण्याचे डिजिटल शिखर १७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुण्यात पार पडलेली 'ब्रिक्स आयसीटी…

11 hours ago

विचारांची मशाल घेऊन अंधाराशी लढलेला लोकशिक्षक : डॉ. नरेंद्र दाभोळकर

चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला समाज, जात-धर्माच्या भिंती आणि प्रश्न विचारण्यालाच लागलेली भीती—या…

1 day ago

श्रीगुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोणते ? Guru Mahima: The Power of Surrender in Dnyaneshwari

गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…

1 day ago

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

2 days ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

3 days ago