Change current situation of dry land poem by Manisha Patil
उपाशी चिमणीचा
खोल आवाज
केळीच्या पानासारखा
चिरत जातो जिवाला
अशावेळी
भयव्याकुळ वाऱ्याची पावलं
शोधू लागतात
मातीच्या हातावरील
कोंभ
काळोखाच्या मिठीतल्या
भयभीत
पायवाटांसाठी
जागत राहतात
चंद्राच्या पापण्या …
ऋतुंच्या फुटव्यासाठी
स्वप्नांचे रुजवे
घालायला हवेत
हा धीर जगवत राहतो
रोपारोपाला…
युगांतराच्या प्रतीक्षेत
टिकून राहतात
पारंब्या
मातीचे बोट धरुन…
दिवसाच्या रिंगणात
कुणी तरी कुठे तरी
घालत राहते पाणी
वांझोट्या नात्यांना…
कोरड्या मातीचे
वर्तमान
बदलावे म्हणून ….
सौ.मनीषा पाटील
देशिंग-हरोली
ज्ञानेश्वरीतील ही ओवी साधकाला बाह्य जगाच्या धावपळीपासून अंतर्मुख शांततेकडे घेऊन जाते. ‘तैसे राहोनि ठायठिके’ म्हणताना…
पुण्याचे डिजिटल शिखर १७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुण्यात पार पडलेली 'ब्रिक्स आयसीटी…
चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला समाज, जात-धर्माच्या भिंती आणि प्रश्न विचारण्यालाच लागलेली भीती—या…
गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…
स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…
कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…