Change current situation of dry land poem by Manisha Patil
उपाशी चिमणीचा
खोल आवाज
केळीच्या पानासारखा
चिरत जातो जिवाला
अशावेळी
भयव्याकुळ वाऱ्याची पावलं
शोधू लागतात
मातीच्या हातावरील
कोंभ
काळोखाच्या मिठीतल्या
भयभीत
पायवाटांसाठी
जागत राहतात
चंद्राच्या पापण्या …
ऋतुंच्या फुटव्यासाठी
स्वप्नांचे रुजवे
घालायला हवेत
हा धीर जगवत राहतो
रोपारोपाला…
युगांतराच्या प्रतीक्षेत
टिकून राहतात
पारंब्या
मातीचे बोट धरुन…
दिवसाच्या रिंगणात
कुणी तरी कुठे तरी
घालत राहते पाणी
वांझोट्या नात्यांना…
कोरड्या मातीचे
वर्तमान
बदलावे म्हणून ….
सौ.मनीषा पाटील
देशिंग-हरोली
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…