शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ढगाळ वातावरणासहित अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता

‘किरकोळ अवकाळीचे वातावरण’

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

महाराष्ट्रात आज मंगळवार दि. १८ ते शनिवार दि. २२ मार्च दरम्यानच्या पाच दिवसात भागपरत्वे दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरणासहित अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. पावसापेक्षा विजा, वारा व गडगडाटीच्या वातावरणाची शक्यता जाणवते.

मध्य महाराष्ट्रातील खानदेश ते कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यापर्यंतच्या दहा जिल्ह्यात आज मंगळवार दि. १८ ते गुरुवार दि. २० मार्च दरम्यानचे तीन दिवस तर मराठवड्यातील आठ जिल्ह्यात आज मंगळवार दि. १८ ते शुक्रवार दि. २१ मार्च दरम्यानचे चार दिवस व विदर्भातील अकरा जिल्ह्यात शुक्रवार व शनिवार दि. २१- २२ मार्च दरम्यानचे दोन दिवस ह्या अवकाळी वातावरणाचा परिणाम जाणवेल, असे वाटते.

विशेषतः मराठवाडा, विदर्भ व जळगांव दक्षिण नगर सातारा सांगली सोलापूर ह्या जिल्ह्यात शुक्रवार दि. २१ मार्च ला ह्या वातावरणाचा प्रभाव अधिक जाणवेल असे वाटते.

दरम्यानच्या पाच दिवसात कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात दिवसाच्या दुपारच्या कमाल तापमानात काहीशी घट होवून तापमान सध्यापेक्षा २-३ डिग्रीने खालवेल, असे वाटते.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

8 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

20 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago