Cold will be felt again from Sunday Manikrao Khule Comment
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
दोन दिवस, मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तर १७ नोव्हेंबर पासून पुन्हा थंडीला सुरवात होईल. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शनिवार १६ नोव्हेंबर रोजी केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर नगण्य अश्या किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते.
विशेषत: मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर ह्या जिल्ह्यातच हा परिणाम अधिक ह्या दोन दिवसात जाणवेल, असे वाटते. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक ह्या जिल्ह्यात मात्र हा परिणाम जाणवणार नाही.
ह्या निरभ्र आकाशामुळे सध्या सकाळ-संध्याकाळी जाणवणाऱ्या थंडीला, ह्या दोन दिवसात काहीसा विराम मिळेल, असे वाटते.
सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान ३३ तर पहाटेचे किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असुन ही दोन्हीही तापमाने हे जवळपास सरासरीपेक्षा दोन अंशाने अधिक जाणवतात.
दक्षिणेकडील चार राज्यात होणाऱ्या पूर्वीय वाऱ्याच्या प्रणालीतून सध्या तेथे पडणाऱ्या पावसाचा परिणामातूनच मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात, १६ नोव्हेंबर पर्यंत ढगाळ वातावरणीय परिणाम जाणवणार आहे.
रविवार दि. १७ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा हळूहळू थंडीसाठीची स्थिती पूर्ववत होईल, असे वाटते, तसेच मुंबईसह कोकणातही त्यामुळे ढगाळ वातावरणही निवळेल, असे वाटते.
ह्या नंतर, आजपासुन, पुढील दहा दिवस म्हणजे सोमवार दि.२५ नोव्हेंबरपर्यन्त चक्रीवादळाच्या बीजरोवणी साठीची कोणतीही वातावरणीय निर्मितीही दोन्हीही समुद्रात सध्या तरी जाणवत नाही. त्यामुळे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातही थंडीसाठी अटकाव करणारा कोणताही वातावरणीय परिणाम जाणवणार नाही, असे वाटते..
सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…