काय चाललयं अवतीभवती

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन

कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात येत आहेत. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रसिद्ध झालेली पुस्तके येत्या १५ फेब्रुवारी, २०२४ पर्यत पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

दमसाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यासह बेळगाव परिसरातील लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात. देवदत्त पाटील पुरस्कार (कादंबरीसाठी), अण्णा भाऊ साठे पुरस्कार (कथा, ललितसाठी), शंकर खंडू पाटील पुरस्कार (कथासंग्रहासाठी), कृ.गो.सूर्यवंशी पुरस्कार ( वैचारिक, संशोधनासाठी ), शैला सायनाकर पुरस्कार ( कवितासंग्रहासाठी), चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन पुस्तकासाठी) याबरोबरच बालवाडःमय पुरस्कारही देण्यात येतो.

तरी इच्छुक लेखक, प्रकाशक यांनी पुस्तकाच्या दोन प्रती , फोटो आणि परिचय अर्जासोबत १५ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत कार्यवाह, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, जी-६, स्मृती आपर्टंमेंट, बाबुजमाल रोड, सरस्वती टाँकीजवळ, कोल्हापूर ४१६०१२ या पत्यावर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

5 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

18 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

23 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago