काय चाललयं अवतीभवती

दमसाचे साहित्य पुरस्कार जाहीर

वसंत गायकवाड, सीताराम सावंत, आबासाहेब पाटील, कविता ननवरे यांना दमसाचे ग्रंथ पुरस्कार

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२२ मधील ग्रंथ पुरस्कारासाठी वसंत गायकवाड, सीताराम सावंत, आबासाहेब पाटील, कविता ननवरे यांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. २५ मे २०२३रोजी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि लेखकांची नावे अशी –

१. देवदत्त पाटील पुरस्कार: वसंत गायकवाड – तथागत गौतम बुद्ध, (कादंबरी ),
२. शंकर खंडू पाटील पुरस्कार: जयवंत आवटे – बारा गावचं संचित (कथासंग्रह),
३. अण्णा भाऊ साठे पुरस्कार: सीताराम सावंत – हरवलेल्या कथेच्या शोधात
४. कृ.गो.सूर्यवंशी पुरस्कार: –विनायक होगाडे – डिअर तुकोबा ( संकीर्ण) ,
५ . शैला सायनाकर पुरस्कार: आबासाहेब पाटील – घामाची ओल धरून (कवितासंग्रह),
६ .चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन) – सगळेच ऋतू दगाबाज – कविता ननवरे (कवितासंग्रह ) आणि
७. बालवाड्मय पुरस्कार – गांडूळाशी मैत्री – वंदना हुळबत्ते

विशेष पुरस्कार :

१. संत गाडगेबाबा समग्र ग्रंथ – रा. तु. भगत ,
२. राजर्षी शाहू आणि भटके विमुक्त – व्यंकाप्पा भोसले
३. जीवनरंग – अच्युत माने
४. पाषाणपालवी – बी. एम. हिर्डेकर
५. लढवया – सुभाष ढगे पाटील
६.ऑनलाईन शिक्षण पद्धती – गणपती कमळकर,
७. सत्य असत्याशी मन केले ग्वाही – प्रशांत गायकवाड,
८.रे आभाळा – रामकली पावसकर,
९. आदिवासी कवितेचा परामर्श – गौतम जाधव,
१०. संचित – प्रकाश काशीद
११. आवडलं ते निवडलं – अभिजीत पाटील
१२. थेंबातला समुद्र – वैष्णवी अंदुरकर
१३. बाभूळमाया – विकास गुजर
१४. कोल्हापूरचे महापौर – गुरुबाळ माळी/आप्पासाहेब माळी/सतीश घाटगे
१५. सुलवान – मेघा रमेश पाटील
१६. वर्तुळाच्या आतबाहेर अस्वस्थ मी – राजेंद्र शेंडगे
१७. कपडे वाळत घालणारी बाई – हर्षदा सुंठणकर
१८. ऐहिकाच्या मृगजळात – पूजा भडांगे
१९. शाळा सुटली – प्रणिता शिपुरकर
२०. पकाल्या – खंडेराव शिंदे
२१. चैत्रायन-शैलजा टिळे- मिरजकर
२२. वंचितांचे अंतरंग- अशोक बापू पवार
२३. गझल साया – सिराज शिकलगार

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर ,सांगली, सातारा ,सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. २०२२ या वर्षातील ग्रंथ पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून डॉ. रवींद्र ठाकूर, डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. दिलीप कुलकर्णी, डॉ. गोपाळ गावडे, सुनील इनामदार, गौरी भोगले यांनी काम पाहिले.

पुरस्कार वितरण समारंभ गुरुवारी (ता. २५ मे) रोजी सकाळी साडे दहा वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. दि. बा. पाटील, कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी सांगितले आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

1 hour ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

13 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago