काय चाललयं अवतीभवती

श्रीमद् ग्रंथराज दासबोध…. “अभ्यास” करण्यासाठीचा ग्रंथ….!

श्रीमद् ग्रंथराज दासबोध…. “अभ्यास” करण्यासाठीचा ग्रंथ….!

दासबोध हा आचार, विचारांची प्रणाली आहे. समर्थांनी तत्वज्ञान, व्यवहार सहज समजेल अशा सोप्या भाषेत दासबोधात समजून सांगितला आहे. ज्ञान सामर्थ्य प्रदान करते म्हणून ज्ञान व विवेकाला समर्थांनी परमोच्च स्थान दिले. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घालावी याचे उत्तम पद्धतीने मार्गदर्शन समर्थांनी दासबोधात केले आहे.

कल्पना धर्माधिकारी

केंद्र संचालक, पुणे
श्रीग्रंथराज दासबोध अध्ययन
६, सुयोग हाईट्स, स्नेह पँरडाईज,
पौड रोड, कोथरूड, पुणे ४११०३८
फोन : ९८८१०२३७६०

आज दासनवमी……! श्री समर्थ म्हटले की सर्वांच्या नजरेसमोर प्रथम येतो तो “ग्रंथराज दासबोध”! दासबोध म्हणजे साक्षात श्री समर्थ ! समर्थ रामदासांचा “दासबोध” म्हणजे सत्यम् शिवम् सुंदरमचा अविष्कार आहे. दासबोध हा आचार, विचारांची प्रणाली आहे. समर्थांनी तत्वज्ञान, व्यवहार सहज समजेल अशा सोप्या भाषेत दासबोधात समजून सांगितला आहे. ज्ञान सामर्थ्य प्रदान करते म्हणून ज्ञान व विवेकाला समर्थांनी परमोच्च स्थान दिले. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घालावी याचे उत्तम पद्धतीने मार्गदर्शन समर्थांनी दासबोधात केले आहे. परिश्रम करण्याची शिकवण, नेटक्या संसाराचा उपदेश, ज्ञानोपासनेचा उपदेश दासबोधातच मिळतो. शरीर, मन, आत्मा, मेंदू या सा-यांचा विकास झाला पाहिजे, तसेच नुसती बुद्धी असून उपयोग नाही तर शरीरानेही साथ दिली पाहिजे हा मोलाचा संदेश समर्थांनी दासबोधातून दिला आहे.

कष्टेवीण काही नाहीl कष्टेवीण फळ नाहीll

केल्याविना काहीच नाहीl साध्य जगीll

माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आळस! हा सर्वात आधी टाकून “सदा सर्वकाळ कार्यरत राहावे, तसेच व्यस्त रहाण्याविषयी” दासबोध सर्वांच्या डोळ्यात अंजन घालतो.

          अखंड सावधान असावेl दुश्चित कदापि नसावेll

          तजविजा करीत बसावेl  एकान्त स्थळी ll

आयुष्यात नेहमी प्रसंग ओळखून वागावे, सावधानता अंगी बाळगावी…. निर्भय व कर्तव्यतत्पर व्हाल तर यश तुमचेच आहे याची ग्वाही समर्थ दासबोधात देतात! श्रीसमर्थांना त्या काळात “नवा पुरुष” घडवावयाचा होता. त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्याची नितांत गरज आजही तितकीच आहे हे सद्यस्थिती पाहता प्रकर्षाने जाणवते.  पूर्ण मोठा दासबोध वाचणे व त्यामधून समर्थांनी सांगितलेले तत्वज्ञान आत्मसात करणे ही गोष्ट संसारामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी व्यग्र असणाऱ्या स्त्री-पुरुषांना म्हणावी तेवढी सहजसाध्य व सोपी नाही. अशांसाठीच  समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्यातर्फे  वेगवेगळ्या केंद्रांद्वारे “पत्रद्वारे तसेच ईमेलद्वारे दासबोध अभ्यासक्रम” हा उपक्रम गेली ४५ वर्षाहून अधिक काळ निशुल्क चालविला जात आहे. त्यासाठी dasbodh.abhyas@gmail.com तसेच ८६६९४०५९७१ या नंबरवर अभ्यासार्थी संपर्क साधू शकतात.

अशा दासबोध अभ्यासात सातत्य ठेवल्याने विचारातून आचार परिवर्तन होऊन दासबोधाचे अंतरंग उलगडत जाते. अध्यात्मिक संकल्पना स्पष्ट होतात. नरदेहाचे महत्व, मर्यादा आणि सार्थक कशात आहे हे कळते. आत्मिक विकासाबरोबर  समाजाचा विकास ही विचारधारा दृढ होऊ लागते. थोडक्यात “यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली…. दासबोध” असे म्हटले तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही.

दासबोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनातील नैराश्य प्रसंगी मानसिक धीर देऊन नवचैतन्य निर्माण करतात. अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक होतात. संभ्रम दूर करतात. योग्य व्यवहार लक्षात येऊन तो आचरणात आणण्याचे बळ देतात. आत्मविश्वास वाढतो. साधेच औषध पण निश्चित गुणकारी असेच हे आहे. दासबोध हा पारायणाचा ग्रंथ नसून तो अभ्यास, मनन, चिंतन करून आत्मोन्नती करण्यासाठी आहे हे वर्षानुवर्षाच्या अनुभवावरून सिद्धा झाले आहे. “पहावे आपणासी आपण” ही अवस्था दासबोध देतो. “क्रिया पालटे तत्काळ या वचनाची प्रचीती दासबोध तत्काळ देतो…..!

दासबोधी समर्थ निवासl ग्रंथी वरदान निजध्यासl

निजध्यासेचि प्रत्ययासl येत ग्रंथस्वरूपेll

llजय जय रघुवीर समर्थll

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

48 minutes ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

14 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

19 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago