शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार एआय’ अॅप डाउनलोड करून डिजिटल शेतीचा भाग व्हावे

सिंधुदुर्गनगरी :- शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हांनाचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय हे अॅप लाँच केले आहे. कृषी विभागाने विकसित केलेले एक अत्याधुनिक अॅप आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने हे अॅप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. तरी शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन महाविस्तार एआय अॅप डाउनलोड करावे आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.

मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अॅप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला, आणि आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन करते. महाविस्तार एआय अॅपमधील आय चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देतो. रिअल टाइम हवामान अंदाज स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल-टाइममध्ये दाखवते. कृषि विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान, कर्जमाफी, आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळु शकतील. अॅपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत, ज्यात पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी, आणि जैविक शेती याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल. अॅपमधील आय तंत्रज्ञान मध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करुन उपाय मिळवू शकतात.

महाविस्तार आय अॅप शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी अनेक फायदे घेऊन आले आहे, त्यामुळे सल्ला त्यांच्या मोबाइलवर मिळतो, ज्यामुळे वेळ वाचतो, चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची विक्री आणि नियोजन करू शकतात. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

जिल्ह्यातील २५ हजार ७९५ शेतकरी महाविस्तार ए आय अॅपचा वापर करुन डीजीटील बनले आहेत.
वैभववाडी २ हजार २५९,
देवगड २ हजार ९४६,
कणकवली ३ हजार ५८६,
मालवण ३ हजार ३०१,
कुडाळ ४ हजार ६०७,
वेंगुर्ला २ हजार ११९,
सावंतवाडी ५ हजार ८६९,
दोडामार्ग १ हजार १०८.

लिंक https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.mahapocra.mahavistaarai

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

6 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

19 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago