काय चाललयं अवतीभवती

विद्रोहा बरोबर प्रेमाचाही गारवा !

साहित्य संगीत संमेलनातील कविसंमेलन बहरले

राजापूर, दोडामार्ग ते वैभववाडी दूरच्या भागातील कवींचीचा सहभाग

कणकवली : शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या साहित्य – संगीत संमेलनातील कविसंमेलन विशेष लक्षवेधी ठरले. ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनात कवींनी निसर्ग, सामाजिक जाणीव आणि राजकीय कोंडी अशा विविध विषयांवर आपल्या कवितांमधून मनमोकळे भाष्य केले. विद्रोहाच्या तीव्र सूरांना प्रेमाच्या हलक्या-फुलक्या किस्स्यांची जोड देत कवींनी उपस्थित रसिकांचे मन जिंकले. वय झाले तरी ‘प्रेमाने वेणीत गजरा माळायला अजूनपर्यंत कोणी मिळालाच नाही’ अशी कविता सादर करत कवयित्री दर्शना पाताडे यांनी मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी मिळत नसल्याची आजच्या विवाहसंस्थेतील समस्या प्रभावीपणे उलगडून दाखवली.

राजापूर, दोडामार्ग, बांदा, वैभववाडी, मालवण, देवगड अशा दूर दूरच्या भागातून सुमारे 50 कवी या कवी संमेलना सहभागी झाले होते. आपल्या कवितातून वेगवेगळ्या आपल्या भावना प्रगट करताना कवीनी आपल्यातील माणुसकीचे ही दर्शन घडविले. कवयित्री निशिगंधा गावकर यांनी याबाबत आपल्या कवितेतून भाष्य करताना ‘माणुसकीचे जपून नाते माणूस आत जपावा, आणि सर्वांना आनंद देत आनंदही घ्यावा’ असे आवाहन केले. त्यावेळी उपस्थितानीही टाळ्यांचा प्रतिसाद दिला.

अनेक कवीनी आपल्या मालवणी कविता सादर करून आपल्या बोली भाषेचा गोडवा जपला. यात बांदा येथील कवी हरिचंद्र भिसे आणि दोडामार्ग येथील कवी रामचंद्र शिरोडकर यांच्या मालवणी कवितेला उस्फूर्त दाद मिळाली. कवी संमेलनाचा प्रारंभ बांदा येथील आठवीत शिकणारा नैतिक मोरजकर याच्या कवितेने झाली. त्याने रानटी हत्तीला कसा त्रास दिला जातो याचे वर्णन करताना उपस्थितांना अंतर्मुख केले. यानंतर सत्यवान साटम यांनी आपली कविता सादर करून तसाच प्रतिसाद मिळविला. सुधीर गोठणकर यांनी उत्तम प्रकारे कविता गायन करून उपस्थितांची वाहवा मिळवली तर अमर पवार यांच्या मालवणी कवितेने सभागृहात हास्य पसरवले.

मंगेश आरेकर यांनी सूत्रसंचालन केले. या कवी संमेलनात भालचंद्र सुपेकर, संचिता चव्हाण, संगीता पाटील, विद्या पाटील , नंदिनी रावराणे , सायली नारकर, सागर कदम, हर्षल तांबे, संजय तांबे, सिद्धेश खटावकर, किशोर कदम, मधुकर मातोंडकर, पल्लवी शिरगावकर , समीक्षा चव्हाण, शर्मिला केळुसकर, संदीप कदम, आर्या कदम, के एस वरदेकर, प्रगती पाताडे, स्वराज चव्हाण, मालिनी लाड, निलेश जाधव, वैष्णवी सुतार आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

यावेळी बोलताना कवी संमेलन अध्यक्ष संध्या तांबे म्हणाल्या साहित्य संमेलने सातत्याने होत असतात परंतु डॉ. निर्मोही फडके यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य आणि संगीत संमेलन आयोजित करून अनेक कला एकमेकाला पूरक असतात हे या संमेलनाचे आयोजक कवी अजय कांडर, स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण, निमंत्रक सुभाष भंडारे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी दाखवून दिले. आताच्या काळात खूप विपुल कविता लिहिली जात आहे परंतु चांगला कवी अपवादानेच मिळत असतो. अशा चांगल्या लेखनासाठी या साहित्य संमेलनाचा उपयोग होईल. हे संमेलन दरवर्षी आयोजित केले जावे. आपले सर्वतोपरि सहकार्य संमेलनाला मिळेल. सातत्याने असे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात तेव्हा समाजात काही चांगले बदल घडत असतात.साहित्य आणि संगीत बदलाचा विचार करताना अशा संमेलनाची नितांत गरज आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

23 minutes ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

9 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

10 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

23 hours ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

1 day ago

शेतकऱ्याचं जगणं, मरणं आणि मरणानंतरची परवड सांगणारं नाटक : ‘कर्जबळी’

शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…

1 day ago