काय चाललयं अवतीभवती

विद्रोहा बरोबर प्रेमाचाही गारवा !

साहित्य संगीत संमेलनातील कविसंमेलन बहरले

राजापूर, दोडामार्ग ते वैभववाडी दूरच्या भागातील कवींचीचा सहभाग

कणकवली : शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या साहित्य – संगीत संमेलनातील कविसंमेलन विशेष लक्षवेधी ठरले. ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनात कवींनी निसर्ग, सामाजिक जाणीव आणि राजकीय कोंडी अशा विविध विषयांवर आपल्या कवितांमधून मनमोकळे भाष्य केले. विद्रोहाच्या तीव्र सूरांना प्रेमाच्या हलक्या-फुलक्या किस्स्यांची जोड देत कवींनी उपस्थित रसिकांचे मन जिंकले. वय झाले तरी ‘प्रेमाने वेणीत गजरा माळायला अजूनपर्यंत कोणी मिळालाच नाही’ अशी कविता सादर करत कवयित्री दर्शना पाताडे यांनी मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी मिळत नसल्याची आजच्या विवाहसंस्थेतील समस्या प्रभावीपणे उलगडून दाखवली.

राजापूर, दोडामार्ग, बांदा, वैभववाडी, मालवण, देवगड अशा दूर दूरच्या भागातून सुमारे 50 कवी या कवी संमेलना सहभागी झाले होते. आपल्या कवितातून वेगवेगळ्या आपल्या भावना प्रगट करताना कवीनी आपल्यातील माणुसकीचे ही दर्शन घडविले. कवयित्री निशिगंधा गावकर यांनी याबाबत आपल्या कवितेतून भाष्य करताना ‘माणुसकीचे जपून नाते माणूस आत जपावा, आणि सर्वांना आनंद देत आनंदही घ्यावा’ असे आवाहन केले. त्यावेळी उपस्थितानीही टाळ्यांचा प्रतिसाद दिला.

अनेक कवीनी आपल्या मालवणी कविता सादर करून आपल्या बोली भाषेचा गोडवा जपला. यात बांदा येथील कवी हरिचंद्र भिसे आणि दोडामार्ग येथील कवी रामचंद्र शिरोडकर यांच्या मालवणी कवितेला उस्फूर्त दाद मिळाली. कवी संमेलनाचा प्रारंभ बांदा येथील आठवीत शिकणारा नैतिक मोरजकर याच्या कवितेने झाली. त्याने रानटी हत्तीला कसा त्रास दिला जातो याचे वर्णन करताना उपस्थितांना अंतर्मुख केले. यानंतर सत्यवान साटम यांनी आपली कविता सादर करून तसाच प्रतिसाद मिळविला. सुधीर गोठणकर यांनी उत्तम प्रकारे कविता गायन करून उपस्थितांची वाहवा मिळवली तर अमर पवार यांच्या मालवणी कवितेने सभागृहात हास्य पसरवले.

मंगेश आरेकर यांनी सूत्रसंचालन केले. या कवी संमेलनात भालचंद्र सुपेकर, संचिता चव्हाण, संगीता पाटील, विद्या पाटील , नंदिनी रावराणे , सायली नारकर, सागर कदम, हर्षल तांबे, संजय तांबे, सिद्धेश खटावकर, किशोर कदम, मधुकर मातोंडकर, पल्लवी शिरगावकर , समीक्षा चव्हाण, शर्मिला केळुसकर, संदीप कदम, आर्या कदम, के एस वरदेकर, प्रगती पाताडे, स्वराज चव्हाण, मालिनी लाड, निलेश जाधव, वैष्णवी सुतार आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

यावेळी बोलताना कवी संमेलन अध्यक्ष संध्या तांबे म्हणाल्या साहित्य संमेलने सातत्याने होत असतात परंतु डॉ. निर्मोही फडके यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य आणि संगीत संमेलन आयोजित करून अनेक कला एकमेकाला पूरक असतात हे या संमेलनाचे आयोजक कवी अजय कांडर, स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण, निमंत्रक सुभाष भंडारे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी दाखवून दिले. आताच्या काळात खूप विपुल कविता लिहिली जात आहे परंतु चांगला कवी अपवादानेच मिळत असतो. अशा चांगल्या लेखनासाठी या साहित्य संमेलनाचा उपयोग होईल. हे संमेलन दरवर्षी आयोजित केले जावे. आपले सर्वतोपरि सहकार्य संमेलनाला मिळेल. सातत्याने असे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात तेव्हा समाजात काही चांगले बदल घडत असतात.साहित्य आणि संगीत बदलाचा विचार करताना अशा संमेलनाची नितांत गरज आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

17 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

1 day ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

2 days ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago