संशोधन आणि तंत्रज्ञान

क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये भारतीय लष्कराने घेतली मोठी झेप

पुणे – भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने 26 मार्च 2025 रोजी पुणे येथे ‘क्वांटम टेक्नॉलॉजी: भविष्यातील युद्धांवर होणारा परिणाम आणि पुढील वाटचाल’, या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील आघाडीच्या तज्ञांच्या सहकार्याने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.   

आधुनिक युद्धात क्वांटम कॉम्प्युटिंग, क्रिप्टोग्राफी आणि सेन्सिंगची विध्वंसक भूमिका यावर वरिष्ठ सरकारी अधिकारी, नामवंत संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील धुरिणांनी यावेळी माहिती दिली. परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ दक्षिण कमांड, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी कार्यक्रमाचे बीजभाषण दिले. त्यांनी क्वांटम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठीचा पथदर्शक आराखडा सादर केला.

या चर्चासत्रात क्वांटम टेक्नॉलॉजीचे संभाव्य लष्करी अनुप्रयोग तसेच लष्करी रणनीतींवर त्यांचा परिणाम, उदयोन्मुख धोके, आणि लष्करी कारवायांमध्ये त्याचा समावेश करण्याच्या संधी या मुद्द्यांवर विस्ताराने माहिती देण्यात आली आणि लष्कर, शिक्षण तज्ञ आणि खासगी क्षेत्र यांच्यातील  सहयोगात्मक प्रयत्नांच्या गरजेवर भर देण्यात आला.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: advanced computingAI in defensecybersecuritydefense AIdefense innovationdefense modernizationencryption technologyfuture warfarehigh-tech militaryIndian defenseIndian militarymilitary advancementsmilitary technologyndian Armyquantum communicationquantum computingquantum cryptographyquantum encryptionquantum mechanics in defensequantum researchquantum securityquantum sensorsquantum technologysecurity innovationstrategic technologyएनक्रिप्शन तंत्रज्ञानक्वांटम एनक्रिप्शनक्वांटम क्रिप्टोग्राफीक्वांटम टेक्नॉलॉजीक्वांटम संगणनक्वांटम संप्रेषणक्वांटम संशोधनक्वांटम सुरक्षाक्वांटम सेन्सरधोरणात्मक तंत्रज्ञानप्रगत संगणनभविष्यकालीन युद्धभारतीय लष्करभारतीय संरक्षणभारतीय सैन्यसंरक्षण आधुनिकीकरणसंरक्षण नवोपक्रमसंरक्षणातील एआयसंरक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तासायबर सुरक्षासुरक्षा नवकल्पनासैन्य तंत्रज्ञानसैन्य सुधारणाहायटेक सैन्य

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

3 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

16 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

21 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago