Interview on Landslide incidence in Konkan
वर्ष २००५. जुलै महिना होता. कोकणातील जुई गाव. गावाच्या माथ्यावर डोंगर. धो-धो पाऊस सुरू होता. गावातील गुराख्यांनी डोंगरावरची झाडं वाकलेली पाहिली, वरच्या बाजूला भेगा रुंदावत होत्या. सायंकाळी गावकरी जमले. काय करायचे सुचेना. सरपंचाला कळवायचे तर तो दूर राहत होता. त्यामुळे सकाळी सरपंच आणि तलाठ्याला कळवायचे ठरले. लोंक पांगले आणि थोड्याच वेळात दरड कोसळली. ९७ लोकांचा जीव गेला. दरड कधीच अचानक कोसळत नाही. आधी इशारा देतात. तो समजला तर ठीक, नाहीतर गावंच्या गावं गडप होतात. कोकणातील दरडींच्या चार घटनांमध्ये मिळालेल्या इशाऱ्याची ही कहाणी. तसेच, दरडी म्हणजे काय, त्यांचे प्रकार, त्या कोसळण्याची नैसर्गिक – मानवनिर्मित कारणे, त्या इशारा कसा देतात, तो कसा ओळखायचा, या समस्येवरील उपाय कोणते.. या सर्व मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा व्हिडिओ. या विषयावर दरडींचे तज्ञ डाॅ. सतीश ठिगळे यांची भवताल चे संपादक अभिजित घोरपडे यांनी घेतलेली मुलाखत.
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…
फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…
https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…
शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…
राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…