शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पहाळे टाईप पावसाची दोन दिवस शक्यता नंतर किरकोळच पाऊस

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

मध्य महाराष्ट्र
                                आज व उद्या (१९-२० जून) ला मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
            विशेषतः नंदुरबार धुळे जळगांव नाशिक छ. सं.नगर जिल्ह्यात ह्या पहाळे टाईप पावसाची शक्यता ह्या दोन दिवसात जाणवेल. खान्देशात मात्र हे वातावरण टिकून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
           परवा शनिवार दि. २१ ते २८ जूनपर्यंतच्या आठवड्यात पुन्हा ढगाळ वातावरण राहून किरकोळच पावसाची शक्यता जाणवते.

कोकण-
                          मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्हे तसेच सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील जिल्ह्यात पुढील १० दिवस म्हणजे शनिवार दि. २८ जूनपर्यंत सध्या जाणवतो तसा जोरदार पावसाची शक्यता ही कायम आहे.

विदर्भ
                        विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे शनिवार दि. २१ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असुन त्यानंतर आठवडाभर मात्र पुन्हा तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

मराठवाडा-
                               मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात मात्र पुढील १० दिवस केवळ ढगाळ वातावरण राहूनअगदीच तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

3 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

15 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago