काय चाललयं अवतीभवती

कामेश्वरी साहित्य मंडळाचे पुरस्कार जाहीर

कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था कामेरी (ता.वाळवा जि. सांगली) यांचे वतीने देण्यात येणारे २०२२ चे राज्यस्तरीय हौसाई मातृस्मृती साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक दि.‌ बा. पाटील यांनी या पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली.

साहित्य पुरस्कार निवेदनास महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला असून विविध वाड्मय प्रकारात साहित्यिकांनी दोनशेहून अधिक पुस्तके पाठवली होती. पुरस्कार निवडीसाठी वाड्मयीन तज्ञ परीक्षक नेमले होते.

जाहीर करण्यात आलेले पुरस्कार असे –

१) कादंबरी- ” शेवटची लाओग्राफिया”- प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, गुहागर
२) कथासंग्रह- वर्तमान- प्रा. डॉ. कीर्ती मुळीक, पुणे
३) कवितासंग्रह- उमलावे आतुनीच- प्रा प्रतिभा सराफ, मुंबई
४) संकीर्ण – अक्षरलिपी- प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार,कोल्हापूर
५) बालसाहित्य – जगावेगळा‌ कीर्तनकार- बबन शिंदे, कळमनुरी, हिंगोली
६) ललित – पाय आणि वाटा- सचिन वसंत पाटील कर्नाळ, सांगली
७) कथासंग्रह- सारिपाट ( कथाकार रावजी संताजी शिंदे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार) – अंकुश गाजरे,शेळवे, सोलापूर
८) कवितासंग्रह- घामाची ओल धरून- (शीघ्रकवी, तमाशा सम्राट, नायकू जाधव राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार) आबासाहेब पाटील, मंगसुळी
९) ललित गद्य – संकल्प सिद्धी (हुतात्मा विष्णू भाऊ बारपटे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार) प्राचार्य गो. वि. कुलकर्णी,कराड

कामेरी येथे होणाऱ्या कै. हौसाई मातृस्मृती साहित्यसंमेलनात साहित्य पुरस्कार वितरण मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. साहित्य पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

1 hour ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

14 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

15 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

1 day ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 days ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago