ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये करटोली या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पतीआरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल – 9850139011,9834884804

वनस्पतीचे नाव- करटोली(कर्टीली)

शास्त्रीय नावमोमारडीका डायओयिका

कुळ कुकुरबिटेसी

वनस्पतीचे वर्णन

करटोलीचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट, पश्चिम महाराष्ट्र याठिकाणी आढळतात. दक्षिण महाराष्ट्र, गुजरात याठिकाणी करटोलीची काही प्रमाणात शेतात लागवड करतात. या वेलींना कंद असतात. कंद बहु वर्षायु असून  ती औषधांत वापरतात.

खोड – नाजूक आधाराने वर चढणारे

पाने – साधी, एकाआड एक, रुंद, अंडाकृती, हृदयाकृती, ३-५ विभागीय, ३-१० सेमी लांब रुंद कडा दातेरी

फुले – पिवळी, नियमित एकलिंगी, नर व मादी फुले वेगवेगळी वेलींवर येतात. फुले पानांच्या बगलेतून एकाडी वर येतात. नर फुलाच्या देठाशी मोठा छेद असतो.

फळे – लांब गोलाकार, ५-७ सेमी लांब, फळांवर नाजूक काव्याचे आवरण, बिया अनेक तांबड्या गरात लगडलेल्या असतात.

उपयोग

ही वनस्पती कुकुरबिटेसी म्हणजेच भोपळ्याच्या कुळातील आहे. करटोलीला जून-ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात. करटोलीच्या स्री जातीतील वेलाचे कंद औषधात वापरले जातात. कंद लंब गोलाकार पिवळट पांढरे असून, त्यावर गोल कंकणाकृती खुणा असतात व त्याची रुची तुरट असते.

  1. करटोली डोकेदुखी वर उत्तम औषध आहे. डोकेदुखीत पानांचा रस, मिरी,रक्तचंदन आणि नारळाचा रस एकत्र करून चोळतात.
  2. रर्क्तांशात  कंदाचे चूर्ण देतात कंदाचे चूर्ण व वंगभस्म मधुमेहात देतात. डोक्याचा वास, मुतखडा सर्व प्रकारची विषबाधा, हत्तीरोग या विकारात कंदाचा वापर करतात.
  3. करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीचा रक्तस्राव थांबविण्यासाठी आणि आतड्यांच्या तक्रारींत उपयोगी आहे. कंद कफोत्सारक आणि थंडी वाजून येणाऱ्या तापात उपयुक्त आहे. पाने कामोत्तेजक, कृमिनाशक असून त्रिदोष, ताप. बद्धकोष्ठता, दमा, श्वासनलिका दाह, उचकी, मुळव्याध यावर गुणकारी आहे.
  4. याचे फळ कडू, उष्ण, संसर्गरक्षक, दीपक आणि थोडे विरेचक आहे. वात, कुष्ठरोग, मुत्रस्राव, प्रमेह व मधुमेहात करटोलीची फळे उपयुक्त आहेत.
  5. अति लाळ सुटणे, मळमळ, हृदयाचे त्रास  यावर गुणकारी आहे.
  6. रक्त रोग, डोळ्यांचे रोग, धावरे याविकारात करटोलीचा वापर करतात.
  7. फळांची भाजी कारल्यासारखी असून पावसाळ्याच्या अखेरीस हि भाजी बाजारात येते.
  8. हि भाजी रुचकर असून पोट साफ होण्यासाठी, यकृतातून पित्ताचा स्राव नीट होण्यासाठी उपयुक्त आहे.
  9. सर्दी, खोकला, ताप या पावसाळ्यातील विकारांवर हि भाजी गुणकारी आहे.
  10. त्वचारोग होऊ नये म्हणून हि भाजी अवश्य खावी.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

8 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

13 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

22 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

23 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago