काय चाललयं अवतीभवती

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवा

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवा. यंदाच्या वर्षी बालकुमार वाङ्मय प्रकारासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत.

मराठीचे अभ्यासक, संशोधक मार्गदर्शक व सुप्रसिद्ध साहित्यिक समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांचे स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद व किसनराव पाटील ज्ञानपरंपरा यांचे वतीने प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार व प्राचार्य डॉ. किसनराव पाटील खानदेशस्तरीय वाड्:मय पुरस्कार देण्यात येतात.

राज्यस्तरीय पुरस्कार अकरा हजार रोख, सन्मानपत्र व शाल श्रीफळ तर खानदेशस्तरीय पुरस्कार पाच हजार रोख, सन्मानपत्र व शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सन 2021 पासून हे पुरस्कार दिले जातात.

2021 साली कथा: मनोहर सोनवणे(पुणे), युवराज पवार , 2022 साली कविता: पवन नालट (अमरावती), लतिका चौधरी(नंदूरबार), ऊषा हिंगोणेकर (जळगाव) आणि 2023 साली कादंबरी: ज्ञानेश्वर जाधवर (पुणे), विलास मोरे (एरंडोल) यांना वाड:मय प्रकारांसाठी हे पुरस्कार दिले गेले.

2024 साठी हे दोन्ही पुरस्कार बालकुमार वाङ्मय ( कथा, कादंबरी, कविता, नाट्य, इ.) ह्या वाङ्मय प्रकारासाठी दिले जाणार आहेत. तेव्हा ह्या दोन्ही वाङ्मय पुरस्कारासाठी १ जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 मध्ये प्रकाशित बालकुमार वाङ्मयातील सर्व प्रकारांतील दोन प्रतित लेखकाच्या फोटो, परिचयासह 31, जानेवारी 2023 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन प्राचार्य किसनराव पाटील ज्ञानपरंपरेच्या वतीने डॉ. अशोक कौतिक कोळी ( मो.9421568427 ) यांनी केले आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता – प्रा. डॉ. वासुदेव वाले, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा पाचोरा, तलाठी कॉलनी, पाचोरा जि. जळगाव -424201 मो. 9420788336

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

11 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

16 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago