शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पुढील १२ दिवस(दर्शवेळ आमावस्या पर्यन्त) थंडीचेच !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

मालेगांव (नाशिक) ला रात्री अतितीव्र थंडीची लाट तर दिवसा हूडहुडी !

                   १- चक्रवादळे व थंडी –

                  बंगालच्या उपसागरात ‘सेन-यार’ व ‘दिट-वाह’ अश्या दोन चक्री वादळांची निर्मिती होऊनही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चढ-उतारासहित (म्हणजे दि.७ डिसेंबर संकष्ट चतुर्थी पर्यन्त) महाराष्ट्रात अपेक्षित थंडी अनुभवली गेली.

                  २- पुढील थंडी

                  आजपासुन पुढील १२ दिवस म्हणजे १९ डिसेंबर (मार्गशीर्ष दर्शवेळ आमावस्ये) पर्यन्त महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवेल, असे वाटते.
                     मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात नाशिक, छ. सं. नगरसह खान्देश, मराठवाडा विदर्भाच्या काही भागात रात्री थंडीच्या लाटेसह तर दिवसा थंड दिवसामुळे हूडहुडीचा अनुभव येऊ शकतो.
                  मुंबईसह कोकणात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके जाणवू शकते, असे वाटते.

३- सध्याची अति तीव्र थंडीची लाट 👇

‘ मालेगांव(नाशिक)  किमान तापमान ९.०(-१०.७), कमाल तापमान २६.८(-५.२)

  ४-सध्याची थंडीची लाट 👇
   
              अमरावती – ९.६(-४.९), यवतमाळ ८.८ (-५.७)
               
५-सध्याची थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती 👇
       
        गोंदिया- ९.०(-४.१), वाशिम ११.४(-५.८)

 ६-एकांकी किमान तापमान व केवळ जाणवणारी थंडी-

             अहिल्यानगर ९.५, जळगांव ९.४, जेऊर ९.०, छ. सं. नगर १०, नांदेड ९.९, नागपूर ९.६

 ७-थंडीची शक्यता कश्यामुळे-

              (i) उत्तर भारतातून येणारे ईशान्यई वारे महाराष्ट्रात पूर्वीय होत असून हवेचा दाब ही पूर्ववत म्हणजे १०१६ हेक्टपास्कल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडी टिकून राहण्याची शक्यता जाणवते.
             (ii) दक्षिण भारतातील ईशान्य(हिवाळी) मान्सूनचा प्रभाव काहीसा कमी होण्याच्या शक्यतेमुळे तेथील हंगामी पूर्वीय वारे १३ अंश अक्षवृत्ता दरम्यानच मर्यादित राहण्याच्या शक्यतेमुळे, उत्तर भारतातुन महाराष्ट्रात येणाऱ्या थंडीला अटकाव होण्याची शक्यता नाही.
           (iii) वायव्य आशियातून, सध्या उत्तर भारतात नियमितपणे एकापाठोपाठ  मार्गक्रमण करणारे पश्चिमी  (झंजावात)प्रकोप त्यामुळे थंड ईशान्यई वारे महाराष्ट्राकडे झेपावत आहे.
          (iv) समुद्रसपाटी पासून साडेबारा किमी.उंचीपासून ते पार साडेचार किमी उंचीपर्यन वरून खाली (व्हर्टिकली डाऊन) टप्प्याटप्प्याने सरकलेले वेगवान पश्चिमी अतिथंड कोरडे  वाऱ्यांचा झोता(जेट स्ट्रीम) चा पट्टा उत्तर भारताकडून दक्षिणेकडे(हॉरिझॉनंटली लॅटरल)म्हणजे ३९ डिग्री उत्तर पासून ते पार २२ डिग्री उत्तर अक्षवृत्तपर्यंत रुंदावल्यामुळे महाराष्ट्रात थंडीची शक्यता जाणवते.

 

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

3 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

16 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

21 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago