काय चाललयं अवतीभवती

वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

सखाराम डाखोरे, स्मिता दातार, दिवाकर आचार्य, सूरज चौगुले, आलोक जत्राटकर पुरस्कारांचे मानकरी

वर्धा: महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रात नवनव्या उपक्रमांसाठी चर्चेचा विषय असलेल्या मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२६ च्या मारोतराव नारायणे राज्यस्तरीय वाड्मय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. मारोतराव नारायणे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार दिवाकर कृष्ण आचार्य (अकोला) यांच्या ‘पीळ’ या कांदबरीला जाहीर झाला आहे.

मारोतराव नारायणे उत्कृष्ट – कथासंग्रह पुरस्कार सूरज चौगुले (इस्लामपूर, सांगली) यांच्या ‘काठावरच्या चेहऱ्यांच्या कथा’ या कथासंग्रहाला, उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार सखाराम डाखोरे (वसई, पालघर) यांच्या ‘हूलबिगूल’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला असून उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार आलोक जत्राटकर (कोल्हापूर) यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ या वैचारिक लेखसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.

तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट लेखिका म्हणून ‘एक होती हिडिंबा’ या कादंबरीच्या लेखिका डॉ. स्मिता दातार (मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी ६,००० रुपये रोख रक्कम, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकांकडून व प्रकाशकांकडून २५२ ग्रंथ प्राप्त झाले होते.

पुरस्कार निवड समितीचे परीक्षक म्हणून नाशिक येथील प्रयोगशील कादंबरीकार व प्रसिद्ध साहित्यिक राकेश वानखेडे, नागपूर येथील शांती विद्या भवनचे प्राचार्यसमीक्षक डॉ. प्रकाश राठोड, तसेच पुरस्कार संयोजन समितीचे सदस्य श्रीकांत पेटकर, डॉ. संदीप भेले, किशोर पेटकर व सूर्यकांत पाटील यांनी काम पाहीले.

मारोतराव नारायणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक सार्वजनिक बजाज वाचनालयाच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. साहित्यिक व ‘उपरा’कार लक्ष्मण माने आणि मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, सचिव हेमलता नारायणे, प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य प्रभावती नारायणे, अजय भस्मे, धीरज नारायणे, राहूल भस्मे, जिगिषा नारायणे यांनी सांगितले आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: Alok Jatratkar essaysBajaj Library Wardha eventDivakar Acharya novel PeedIye Marathichiye NagariLakshman Mane presenceliterary honour IndiaMaharashtra literature newsMarathi authorsMarathi books awardMarathi cultural awardsMarathi literary awardsMarathi literary recognitionMarathi literature awards 2026Marathi publishingMarathi writers MaharashtraMarotrao Narayane awardSakharam Dakhore poetrySmita Datar writerSuraj Chougule storiesWardha Literary Eventआलोक जत्राटकर समाज आणि माध्यमंइये मराठीचिये नगरीदिवाकर आचार्य पीळ कादंबरीबजाज वाचनालय वर्धामराठी ग्रंथ पुरस्कारमराठी प्रकाशनमराठी लेखकमराठी सांस्कृतिक कार्यक्रममराठी साहित्य पुरस्कार २०२६मराठी साहित्यिक सन्मानमहाराष्ट्र साहित्यमारोतराव नारायणे पुरस्कारराज्यस्तरीय वाड्मय पुरस्कारलक्ष्मण माने उपरावर्धा साहित्य बातमीसखाराम डाखोरे हूलबिगूलसाहित्यिक गौरवसूरज चौगुले कथासंग्रहस्मिता दातार लेखिका

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

3 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

5 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

14 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago