कोल्हापूर – मातोश्री रेखा दिनकर गुरव यांच्या नावे देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी कथासंग्रह, कादंबरी, काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन रवींद्र गुरव यांनी केले आहे. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित साहित्यकृती या पुरस्कारासाठी मागविण्यात येत आहेत. साहित्यकृतीच्या प्रत्येकी दोन प्रती, एक पानी अल्पपरिचय, व्हॉटस् ॲप नंबर, अल्पपरिचयाला टाचणी लावलेला एक फोटो यासह आपला प्रस्ताव १० एप्रिल २०२५ पर्यंत पाठवावा, असे आवाहन गुरव यांनी केले आहे.
सर्वोत्कृष्ट कथासंग्रह, कादंबरी व काव्यसंग्रहासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर साहित्यव्रती पुरस्कारासाठी दहा हजार रुपये रोख गौरवचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल एका ज्येष्ठ साहित्यिकास या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
साहित्यकृती पाठविण्याचा पत्ता-
रवींद्र रेखा गुरव,
मु. कोनवडे, पो. कूर,
ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
पिन कोड ४१६ २०९
मोबाईल नंबर – 9552715910
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…