📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 21, 2026
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेकडून विविध पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

महाराष्ट्र साहित्य परिषद, सोलापूर शाखेकडून २०२५ मध्ये प्रकाशित मराठी साहित्यकृतींसाठी विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

सोलापूरमहाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या सोलापूर शाखेच्या वतीने मराठी साहित्यातील उत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कविता, कथा, कादंबरी, ललितगद्य, अनुवादित साहित्य तसेच चरित्र/आत्मचरित्र या साहित्य प्रकारांतील उत्कृष्ट पुस्तकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये प्रसिद्ध लेखिका विजयाताई जहागीरदार स्मृती साहित्य पुरस्कार उत्कृष्ट कवितासंग्रहासाठी, कै. सौ. निर्मलाताई उत्तरेश्वर मठपती स्मृती साहित्य पुरस्कार उत्कृष्ट कथासंग्रहासाठी, प्राचार्य कै. डॉ. मधुकर कृष्णाजी झांबरे स्मृती साहित्य पुरस्कार ललितगद्य साहित्यकृतीसाठी, हॉटेल सूर्या एक्झिक्यूटिव्ह उत्कृष्ट साहित्य पुरस्कार अनुवादित साहित्यकृतीसाठी, श्रीमती कमला श्रीवल्लभ चंडक स्मृती साहित्य पुरस्कार उत्कृष्ट कादंबरीसाठी तर कै. ज्ञानोबा काळे व कै. सौ. हौसाबाई ज्ञानोबा काळे स्मृती साहित्य पुरस्कार चरित्र किंवा आत्मचरित्र या साहित्यप्रकारासाठी दिला जाणार आहे.

प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये पाच हजार, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे असणार आहे. पुरस्कारासाठी पाठवण्यात येणारी पुस्तके १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली असावीत. लेखकांनी कोणत्याही एका साहित्य प्रकारातील पुस्तकाच्या दोन प्रती ३० जून २०२६ पूर्वी पाठवाव्यात. पुस्तकाच्या मुखपृष्ठ, मलपृष्ठ किंवा पहिल्या पानावर कोणतीही नोंद अथवा मजकूर लिहिलेला नसावा, अन्यथा पुस्तक अपात्र ठरविण्यात येईल. पुरस्कारासाठी पुस्तकांच्या दोन प्रती किशोर चंडक, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, सोलापूर शाखा, मंत्रीचंडक कार्यालय, जवाहरलाल नेहरू वसतिगृह, पार्क चौक, सोलापूर – ४१३००१ या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी अध्यक्ष प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर (९३२५०४६४१५) तसेच प्रमुख कार्यवाह डॉ. नरेंद्र काटीकर (९४२२६४४२४६) यांच्याशी संपर्क साधावा.

Related posts

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारांची घोषणा

महापुराच्या फटक्यावर उसाला पर्याय शोधण्याचा शिरोळच्या दत्त कारखान्याचा प्रयत्न

घाटकुळ येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे आयोजन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406