Monsoon Retreat 2025: Early Withdrawal, Maharashtra Heavy Rain Forecast till September 18
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
माणिकराव खुळे : या वर्षी २४ मे २०२५ रोजी मान्सून केरळ, तामिळनाडू व कर्नाटकात अश्या ३ राज्यात एकाच दिवशी प्रवेश करून देशात दाखल झाला होता.
देशात त्याने आजपर्यंत ११३ दिवस हजेरी लावून आज राजस्थानच्या वाळवंटाच्या, मारवाड भागातील श्री्गंगानगर बिकानेर नागौर फालुदी जैसलमेर जोधपूर बारमेर जिल्ह्यांच्या भागातून त्याच्या अपेक्षित सरासरी तारीख १७ सप्टेंबरच्या ३ दिवस अगोदरच त्याने आज रविवार १४ सप्टेंबरला माघारी फिरत, परतीच्या प्रवासास सुरवात केली आहे. परंतु अजुन साधारण पुढील महिनाभर त्याला देशात परतीचा प्रवास पूर्ण करावयाचा आहे. १५ ऑक्टोबर ह्या त्याच्या सरासरी तारखेदरम्यान देशातून निघून जावा, असे अपेक्षित असते.
आणि त्यानंतर तो दक्षिणेकडील चार राज्यात ईशान्य मान्सून म्हणून तो स्थिरावेल.
माणिकराव खुळे : i) सलग गेले पाच दिवस त्या भागात हवेच्या शुष्क वातावरणाचे प्राबल्य वाढून पावसाची गतिविधिता थांबली.
ii)जमिनीपासून साधारण दिड किमी उंचीपर्यन्त हवेचे उच्च दाबाची प्रत्यावर्ती वाऱ्याची स्थिती निर्माण झाली.
ii)हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण कमी होवून हवेतील सापेक्ष आर्द्रता टक्केवारी खालावली.
Iv )दिवसाच्या कमाल तापमानात वाढ व रात्रीचे किमान तापमानात घट जाणवू लागली. म्हणून तर काल श्री्गंगानगर येथे देशातील सर्वाधिक कमाल तापमान ३८ डिग्री से. ग्रेड होते. v)आकाशातील निरभ्रता वाढली.
ह्या पाच गोष्टींच्या निरीक्षणावरून मान्सून ने परतीच्या पावसास सुरवात केली ह्याची घोषणा झाली.
माणिकराव खुळे : आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. १८ सप्टेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
त्यातही आज सोमवार १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात अतिजोरदार पावसाची शक्यता अधिक जाणवते.
शुक्रवार दि. १९ सप्टेंबर पासुन विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात पावसाचा जोर (तीव्रता) पूर्णपणे नव्हे परंतु काहीसा कमी जाणवेल.
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…