काय चाललयं अवतीभवती

पोवारी बोली संवर्धनासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज – ॲड. लखनसिंह कटरे

  • नागपुरात दुसरे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन उत्साहात
  • मृतप्राय होऊ घातलेल्या पोवारी बोलीचे पुनरुत्थापित करण्याचा निर्णय
  • बोलीभाषा हीच खरीखुरी समाजाच्या संस्कृतीची संरक्षक, प्रवाहक, निर्मिक
  • बोलीभाषेच्या पुनरुत्थान, पुनर्निर्माण आणि पुनर्कथनसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ

भिन्न भिन्न कारणांमुळे संपूर्ण पोवार समाज अखंड भारतात पसरला आहे. यामुळे समाजाच्या संस्कृतीत एकाच वेळी साम्य, समन्वय आणि एकसारखेपणा सोबतच विविधता, बहुसांस्कृतिकता दिसते आहे. म्हणूनच आपली संस्कृती टिकविण्याबरोबरच पोवार समाजाच्या आंतरिक संस्कृतीचा आदर केला गेला पाहिजे. पोवार समाजाच्या जीवनपद्धतीत आलेले काही थोडेफार बदल समजून घेतले पाहिजेत. अशी समन्वयवादी, समजदारीची आणि आदरयुक्त विचारधारा समाजाला, आपल्या बोलीला आणि संस्कृतीला पूरक आणि तारक ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ॲड. लखनसिंह कटरे यांनी नागपूर येथे केले. तसेच पोवारी बोलीच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

कटरे पुढे म्हणाले, समाजाच्या संघटनेद्वारे पोवारी बोली आणि पोवारी संस्कृतीचा संस्थापन, उत्थापन, पुनर्कथन, नव-प्रवर्तन/नव-सृजन सारख्या विषयात परीपूर्ण लक्ष दिले गेल्याचे दिसत नाही. याचा अर्थ आमच्या त्या प्रथम-प्रवर्तक समाज-प्रमुखांचे महत्त्व आणि श्रेय कमी आहे, असे अजिबात नाही, उलट आम्ही त्या आमच्या पूर्वजांचे आभारी आहोत कारण त्यांनी आम्हाला समाजोन्नतीसाठी काम करण्याची दिशा दाखवली. आता आपले लक्ष्य मृतप्राय होऊ घातलेली पोवारी बोलीचे पुनरुत्थापित व पर्यायाने ही बोली अमर कशी होवू शकेल यावर हवे. कारण, कोणत्याही समाजाची बोलीभाषा हीच खरीखुरी त्या समाजाच्या संस्कृतीची संरक्षक, प्रवाहक, निर्मिक राहते. हीच प्रमुख गोष्ट लक्षात ठेवून आपण बोलीभाषेच्या पुनरुत्थान, पुनर्निर्माण आणि पुनर्कथनसाठी कटिबद्ध राहिले पाहिजे.

सांस्कृतिक समृध्दीसाठी चांगल्या साहित्याची नितांत आवश्यकता असते. कारण की, चांगले साहित्य हे वाचकाला अंतर्मुख करते, आणि सोबतच वाचकाची जिज्ञासा आणि संवादाची भूक पण पूर्ण करते. मानवी जीवनाचे विविध अल्पपरिचित पैलू वाचकाच्या दृष्टीस आणून देते, ज्यामुळे वाचकांची जाणीव-कक्षा विशाल आणि सखोल होवू शकते, वाचकाला अस्वस्थ करते, उल्हासित करते, असेही कटरे म्हणतात.

दुसरे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन, नागपूरात झाले. संमेलनाची सुरुवात पुस्तक दिंडीने झाले. हनुमान मंदिर – गणेश मंदिर – दुर्गा मंदिर ते संमेलन स्थळ – पवार विद्यार्थी भवन या मार्गाने दिंडी काढण्यात आली. त्यात संमेलनाध्यक्ष ॲड. लखनसिंह कटरे, मंडळाचे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेश्वर टेंभरे, सचिव ॲड. देवेंद्र चौधरी, स्वागताध्यक्ष प्रा. बालाराम शरणागत, प्रा.अलका चौधरी (बालाघाट), आयोजक पृथ्वीराज रहांगडाले, डाॅ. प्रल्हाद हरिणखेडे (मुंबई), देवानंद टेंभरे, सी. एच. पटले, छगनलाल रहांगडाले, स्वप्नील पटले आदी सहभागी झाले होते.

उद्घाटन सरस्वती पूजन, राजा भोज नमन करून झाले. विचार पिठावर संमेलनाध्यक्ष ॲड. कटरे, सौ.उषादेवी कटरे, राष्ट्रीय क्षत्रिय पवार समाज संघटनेचे अध्यक्ष इंजि. मुरलीधर टेंभरे उपस्थित होते. संमेलनामध्ये डॉ.ज्ञानेश्वर टेंभरे, डाॅ.अशोक राणा, ॲड. देवेंद्र चौधरी, पृथ्वीराज रहांगडाले, नामदेव पारधी (भरुच, गुजरात), डाॅ. नामदेव राऊत, प्रा. तुकाराम किनकर, राजेश राणे, डाॅ. गौरीशंकर टेंभरे, प्रा.अलका चौधरी, डाॅ. तीर्थानंद बन्नगरे‌ हे मान्यवर सहभागी झाले होते.

प्रास्ताविक डाॅ. ज्ञानेश्वर टेंभरे यांनी केले. याप्रसंगी ॲड.देवेंद्र चौधरी, प्रा. बालाराम शरणागत, इंजि.मुरलीधर टेंभरे, डाॅ. नामदेव राऊत, राजेश राणे, डाॅ. गौरीशंकर टेंभरे, डाॅ. तीर्थानंद बन्नगरे, डाॅ. अशोक राणा (प्रमुख पाहुणे), प्रा. अलका चौधरी, प्रा. तुकाराम किनकर आदींचे समयोचित भाषण झाले. आभार छगनलाल रहांगडाले यांनी केले.

मायबोली की सुगम वाटचाल या विषयावरील परिसंवादात तुफानसिं पारधी, सुरेश देशमुख, प्रा.अलका चौधरी यांनी भाग घेतला. कविसंमेलन प्रा.अलका चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यात देवेंद्र चौधरी, हिरदीलाल ठाकरे, यादोराव चौधरी, डाॅ. प्रल्हाद हरिणखेडे ‘प्रहरी’, चिरंजीव बिसेन, इंजि. गोवर्धन बिसेन, वंदना कटरे ‘राम-कमल’, तुकाराम किनकर ‘किंकर’, छगनलाल रहांगडाले, देवानंद टेंभरे, उषाबाई पटले, विद्या बिसेन, रामचरण पटले, सुरेश देशमुख, रवीन्द्र टेंभरे, मुकुंद रहांगडाले, उमेन्द्र बिसेन ‘प्रेरित’, कल्याणी पटले, फिरोज पटले , डाॅ. भारती शरणागत, फुलवंताबाई चौधरी, सी. एच. पटले, किरण राज बोपचे, स्वप्नील पटले, नीतेश टेंभरे आदींनी स्वरचित कवितेचे वाचन केले.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

53 minutes ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

14 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

19 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago