काय चाललयं अवतीभवती

नवी दिल्ली येथे 5-6 नोव्हेंबर 2024 रोजी आशियाई बौद्ध शिखर परिषद

  • नवी दिल्ली येथे 5-6 नोव्हेंबर 2024 रोजी आशियाई बौद्ध शिखर परिषदेचे आयोजन
  • परिषदेला राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून राहणार उपस्थित

नवी दिल्ली – भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन (IBC) च्या सहकार्याने नवी दिल्ली येथे 5 ते 6 नोव्हेंबर 2024 रोजी पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद (ABS) आयोजित करत आहे.  ‘आशिया खंडाच्या बळकटीकरणात बुद्ध धम्माची भूमिका’ ही या शिखर परिषदेची मुख्य  संकल्पना आहे. 

या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.  शिखर परिषदेच्या माध्यमातून, संवादाला चालना देण्यासाठी, समजूतदारपणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बौद्ध समुदायाला भेडसावणाऱ्या समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी आशिया खंडातील विविध बौद्ध परंपरेतील संघाचे नेते, विद्वान, तज्ञ आणि अभ्यासक एकत्र येतील,

आशियाई बौद्ध शिखर परिषदेत या विषयांचा समावेश :

1. बौद्ध कला, वास्तुकला आणि वारसा.
2. बौद्ध कारिका आणि बौद्ध धम्माचा प्रसार.
3. पवित्र बौद्ध अवशेषांची भूमिका आणि समाजातील त्याची प्रासंगिकता.
4. वैज्ञानिक संशोधन आणि कल्याणामध्ये बौद्ध धम्माचे महत्त्व.
5. 21 व्या शतकात बौद्ध साहित्य आणि तत्वज्ञानाची भूमिका.

या विषयांवरील चर्चेबरोबरच, आशियाला जोडणारा धम्म सेतू (पूल) – भारत या संकल्पनेवर आधारित एक विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे;  कार्यक्रमाच्या ठिकाणी इतर सृजनात्मक प्रदर्शनांसह इतर कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

2 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

14 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago