काय चाललयं अवतीभवती

फर्ग्युसन महाविद्यालयातर्फे ‘एक दिवस बळीराजासाठी

‘अमृतवर्षा’ हा उपक्रम बळीराजाशी जोडलं जाण्याचा एक प्रयत्न होता. शेतातून धान्य पिकवण्यासाठी नेमके काय काय कष्ट करावे लागतात, एकंदरीत शेतीची प्रक्रिया काय असते या सगळ्या गोष्टी समजून घेणं हा या उपक्रमाचा उद्देश होता.

पुणे – फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त), पुणे च्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत बुधवार, 20 जुलै रोजी ‘अमृतवर्षा’ (एक दिवस बळीराजासाठी) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत आपला ‘एक दिवस अन्नदात्यासाठी’ दिला. या उपक्रमाचा उद्देश प्रामुख्याने विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार व्हावेत आणि नवीन पिढीला शेतकर्यांच्या कष्टांची जाणीव व्हावी, शेतकरी हा ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता आपल्या शेतामध्ये कष्ट करतो आणि भाताचे उत्पादन घेतो विद्यार्थ्यांना भात लावणीच्या प्रत्यक्ष अनुभव यावा म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खेड तालुक्यातील ‘शिवे’ या गावाला भेट देऊन स्वयंसेवकांनी तेथील शेतकऱ्यांसोबत भातशेतीतील विविध कामं प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेतली.

‘अमृतवर्षा’ हा उपक्रम बळीराजाशी जोडलं जाण्याचा एक प्रयत्न होता. शेतातून धान्य पिकवण्यासाठी नेमके काय काय कष्ट करावे लागतात, एकंदरीत शेतीची प्रक्रिया काय असते या सगळ्या गोष्टी समजून घेणं हा या उपक्रमाचा उद्देश होता. तसेच स्वयंसेवकांना शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून ते करत असणारी कामं, त्यांच्या समस्या या सगळ्याबद्दलही जाणून घेण्याची संधी मिळाली. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या कष्टातून पिकलेलं हे अन्न आपण वाया घालवत असू तर ते थांबवायला हवं याची जाणीवही या उपक्रमाच्या माध्यमातून झाली.

हा उपक्रम यशस्वी करण्यामध्ये शिवे गावातील ग्रामपंचायत सदस्य विनायकजी शिवेकर तसेच माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले स्वयंसेवकांना प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यापासून त्यांच्या नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था बघण्यातही गावकऱ्यांचा सहभाग होता. स्वयंसेवकांचे अनुभव ऐकल्यावर ‘अमृतवर्षा’ या उपक्रमाची उद्दिष्टं सफल झाल्याची भावना कार्यक्रम अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या उपक्रमामध्ये 45 स्वयंसेवकांसोबतच तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष फरांदे, प्रा. शिवाजी कोकाटे आणि डॉ. सोनालिका पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी, कला विभागाचे शैक्षणिक समन्वयक डॉ. आनंद काटीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

9 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

11 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

20 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago