शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नारळामध्ये फळगळ होत आहे, मग करा हा उपाय…

नारळ फळपिकातील महत्त्वाचे रोग व नियंञण 🌴

( सौजन्य – कृषिसमर्पण समुह )

🌴 करपा:

काहीवेळा पानावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो, यामुळे पानावर लालसर-तपकिरी रंगाचे ठिपके पडून पाने पिवळी होतात, असे ठिपके पक्व पानावर अधिक असतात. सुरवातीला आकाराने लहान असणारे ठिपके मोठे होतात आणि एकमेकांत मिसळतात. परिणामतः संपूर्ण पान करपून जाते, त्यामुळे माड कमकुवत होऊन उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

उपाय : हा रोग पाण्याच्या आणि खताच्या कमतरतेमुळे बळावतो, म्हणून पावसाळ्यानंतर बागेला नियमित पाणी द्यावे. शेणखत आणि रासायनिक खते योग्य प्रमाणात द्यावीत. पावसाळ्यापूर्वी रोगग्रस्त माडावरील करपलेल्या झावळ्या काढून माडाच्या निरोगी झावळ्यांवर 1 टक्के तीव्रतेचे बोर्डो मिश्रण अथवा 2 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति 1 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

🌴 फळगळ:

हा रोग कोवळ्या फळांच्या देठावर होतो, त्यामुळे फळे गळतात. सुरवातीला काही वेळेला नारळाच्या झाडांना फळ धरण्यासाठी मादी फुलांना नरफुलातील पुकेसर न मिळाल्याने फळांची नैसर्गिक गळ होते, परंतु काही वेळा बुरशीजन्य रोगांमुळेही फळगळ होते.

उपाय : यासाठी 1 टक्का बोर्डो मिश्रणाच्या दोन फवारण्या एक महिन्याच्या अंतराने कराव्यात. पहिली फवारणी पावसाळ्याच्या सुरवातीला व त्यानंतरची फवारणी एक महिन्यानंतर करावी. नारळाच्या फळांची गळ प्रामुख्याने उंदरांच्या प्रादुर्भावाने होते. उंदीर कोवळी फळे पोखरतात. उंदरांच्या बंदोबस्तासाठी झावळ्या स्वच्छ ठेवाव्यात. औषध दिल्यानंतर 45 दिवस नारळ काढू नयेत, तसेच नारळास 10 किलो निंबोळी पेंड, झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम व कॉपर ही अतिसूक्ष्म अन्नद्रव्ये 200 ग्रॅम प्रति झाड दर वर्षी द्यावीत.

🌴 कोंब कुजणे:

हा रोग मुख्यतः नदीकिनारी असणारी झाडे, समुद्रकिनाऱ्यालगतची झाडे तसेच पर्वत आणि दरीत असणाऱ्या झाडांतही मोठ्या प्रमाणात आढळून येतो. हा रोग झाला असेल तर लहान रोपांचे नुकतेच उमलत असलेले पान मलूल दिसते. असे पान बाहेरील बाजूवर हलक्‍या हाताने दुमडून पाहिल्यास पान नरम पडलेले दिसते. यावरून रोगास सुरवात झालेली आहे असे समजते.

उपाय : नदीकिनारी नारळाची लागवड करावयाची झाल्यास पावसाचा जोर ओसरल्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात लागवड करावी. उघडीप मिळेल त्या वेळी एक टक्का बोर्डो मिश्रणाची सर्व रोपांवर फवारणी करावी मोठया झाडांसाठी कुजलेला संपूर्ण भाग काढून झाल्यावर त्यावर बोर्डो पेस्ट लावावी. पावसाच्या सुरवातीस पाच ग्रॅम मॅन्कोझेब प्लॅस्टिक पिशवीत घेऊन त्याला टाचणीच्या साह्याने छिद्रे पाडावीत. अशा दोन पिशव्या नारळाच्या सुऱ्याजवळ झावळीला बांधाव्यात.

( सौजन्य – कृषिसमर्पण समूह )

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

12 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

1 day ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago