शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अतिवृष्टीमध्ये कापूस अन् तूर पिक व्यवस्थापन

तूर पिक रोग नियंत्रण

⭕ मर
सुरुवातीला झाडांची शेंड्याकडील पाने कोमेजतात, कालांतराने पाने पिवळी पडून जमिनीकडे झुकतात. काही झाडांवर जमिनीपासून खोडांपर्यंत तपकिरी पट्टा दिसून येतो. पीक दोन महिन्याचे असताना पाने व फांद्या सुकू लागतात. थोड्याच दिवसांत संपूर्ण झाड वाळते. फांद्या शेंड्याकडून खाली वाळतात. खोडाचा उभा छेद घेतल्यास त्याचा मधला भाग संपूर्ण तपकिरी, काळा पडल्याचे आढळून येते. रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाणे व जमिनीतील बुरशीच्या बिजाणूपासून होतो.

🛡 नियंत्रण
👉🏾जमिनीची उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी. रोगकारक बुरशी नष्ट होण्यासाठी जमीन चांगली तापू द्यावी.
👉🏾मर रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये पाच-सहा वर्षांपर्यंत तुरीची लागवड करू नये.
👉🏾ट्रायकोडर्माची एकरी १ किलो भुकटी २०-२५ किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीद्वारे द्यावी.

⭕ खोडकुजव्या
पाने सुकून वरच्या दिशेने वळतात, जलदगतीने वाळतात, झाडांची मर अतिशय वेगाने होते. प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यास सर्व रोपे एकदम मरून जातात. जमिनीपासून १०-२० सें.मी. उंचीवरील खोडावर गर्द तपकिरी खोलगट लांब चट्टे दिसतात. सुरुवातीला उथळ आणि कालांतराने ते आत दबले जाऊन खोलवर जातात. फांद्यावर चट्टे दिसतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन झाडाच्या मुख्य बुंध्याला वेढतात. झाड कमकुवत होऊन त्याठिकाणी लगेच तुटते. खोडाच्या चट्ट्यांचा उभा छेद घेतल्यास आतील भाग तपकिरी काळा पडल्याचे दिसून येते.

🛡 नियंत्रण
👉🏾मागील हंगामातील धसकटे वेचून त्यांची विल्हेवाट लावावी.
👉🏾शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
👉🏾उथळ, पाणथळ जमिनीमध्ये तुरीचे पीक घेऊ नये.
👉🏾पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
👉🏾कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कापूस पिक

अतिवृष्टीनंतर कपाशीचे व्यवस्थापन
👉🏽जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असताना किंवा जमिनीत पाणी साचलेले असताना केलेल्या उपाययोजना तितक्या फलदायी ठरत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर पाण्याचा निचरा करून जमीन कोरडी करण्यावर भर द्यावा.
👉🏽पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराला समांतर चर काढून साचलेले पाणी शेताबाहेर काढावे.
👉🏽वरंब्यावर कपाशीची लागवड केलेली असल्यास अतिरिक्त पाणी सरीमधून निघून जाण्यासाठी शेतात खोदलेले चर मोकळे करावे.
👉🏽सखल भागातील पाण्याला वाट करून द्यावी. शक्य असल्यास साचलेले पाणी बाहेर उपसावे.
👉🏽पिकातील अतिरिक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा.
👉🏽वाफसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
👉🏽पोषणासाठी कपाशी झाडावर १९:१९:१९ किंवा डी.ए.पी. १० ग्रॅम प्रति लिटर (१%) याप्रमाणात सात दिवसांच्या अंतराने फवारणी घ्यावी.
👉🏽अन्नद्रव्यांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करावे.
👉🏽कपाशीची झाडे शेंडा खुडण्याच्या अवस्थेत असल्यास शेंडा खुडण्याचे काम आठवड्याने लांबवावे. पाणी साचल्यामुळे झाडाची वाढ मंद झालेली असते. अशा परिस्थितीत शेंडा खुडल्यामुळे अपेक्षित असलेली फळफांद्यांची वाढ व बोंडाच्या वजनातील वाढ मिळत नाही.
👉🏽या हंगामात अति पावसामुळे गंभीर परिस्थिती न र्माण झाली असली, तरी अन्य पिकांच्या तुलनेने कापूस लवचिक वनस्पती आहे. या काळात झाडांतील संप्रेरकांची पातळी बदललेली असते. त्यामुळे एन.ए.ए. किंवा अन्य कोणत्याही संप्रेरकाच्या फवारणीची घाई करू नये. संप्रेरकांचा खूप लवकर वापर केल्यास उत्पादनात घट येते. एकदा माती सुकली आणि सूर्यप्रकाश मिळाला की कपाशी पीक सामान्यपणे पुन्हा वाढू लागेल. पोषकतेच्या बहुतांश समस्या अनेकदा दूर होतात.
👉🏽या काळात आकस्मिक मर, पातेगळ, बोंडसड यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यांच्या निराकरणासाठी उपाययोजना कराव्या.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

1 day ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

1 day ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

2 days ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

3 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

3 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

4 days ago