pravasayan-poem-by-sabana-mastar
बॉम्बे टु गोवा
व्हाया गुवाहाटी – सुरत
प्रवास लोकशाही-प्लस
हिंदूत्वाचा घडला होता..
महाविकासला
सुरूंग लावण्याचा
कट एका राती शिजला होता.
एकेका पुत्राचा स्वाभिमान
अचानक जागा झाला होता.
चौकशीचा ससेमिरा मागे
लागल्यावर जो तो मिळेल
त्या गाडीने धावला होता…
बॅगा लावून खांदा
जरा दुखला होता..
पन्नास कोटींच्या नोटांतील
बापू खुद्दकन हसला होता
दिवस सरला, पहाट सरल्या
प्लाल्यावर प्याला रिचला होता
मध्यान राती डीजेच्या
तालावर ‘एकनाथी
सुर रंगला होता
खुर्च्या, उशा, गाद्या उबवून उबवून
निष्ठेचा, तत्वांचा
धडा शिकवला होता
बंड, क्रांती , उठावाचा
बाजार इथे भरला होता
झाडी, डोंगर, बीच, समुद्राकाठी महाराष्ट्र लाज सोडून निजला होता
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…