काय चाललयं अवतीभवती

पहिल्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीण बांदेकर

पहिल्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीण बांदेकर
29 डिसेंबर रोजी कणकवली येथे संमेलनाचे आयोजन
संस्थाध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत साळुंखे यांची माहिती

कणकवली – सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गच्या वतीने रविवार 29 डिसेंबर रोजी कणकवली येथे पहिले एक दिवशीय साहित्य संमेलन आयोजित केले आहे. सदर संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम आणि सचिव सूर्यकांत साळुंखे यांनी दिली.

या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून कवी तथा समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे विद्यमान अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून कवी संमेलनाला अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री संध्या तांबे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कोकणात विद्रोही परिवर्तनवादी साहित्य चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आणि इथल्या विद्रोही परंपरेतील साहित्यिकांना महाराष्ट्राच्या मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात घेऊन जाण्यासाठी सम्यक संबोधी साहित्य संस्थेची स्थापना करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर पहिले सम्यक संबोधी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

गुणवत्ता असूनही दुर्लक्षित राहणाऱ्या लेखक कवीना प्रेरणा देण्यासाठी सम्यक संबोधी साहित्य पुरस्कार या संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणार असून या संमेलनात या पहिल्या पुरस्काराने कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या अल्लाह ईश्वर या दर्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आजच्या बहुचर्चित कवितासंग्रहाला गौरविण्यात येणार आहे. कोकणात विपुल प्रमाणात कविता लिहिली जाते मात्र सर्वांनाच कविता वाचनासाठी संधी मिळतेच असे नाही. त्यामुळे या संमेलनात दुर्लक्षित राहणाऱ्या कवीना निमंत्रित करून त्यांचे खास कविता वाचन ठेवण्यात आले आहे. तरी ज्या कवींना या संमेलनात कविता वाचायची इच्छा असेल त्यांनी खालील संपर्क नंबरशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

संमेलनाचे अध्यक्ष प्रवीण बांदेकर हे मराठीतील आजचे आघाडीचे कादंबरीकार असून दोन वर्षांपूर्वी त्यांना साहित्य अकादमी सारख्या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आह. चाळेगत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या, इंडियन ॲनिमल फार्म या तीन त्यांच्या कादंबऱ्या बहुचर्चित असून त्यांच्या कादंबऱ्यांचा अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे.

संमेलनाच्या अधिक माहितीसाठी आणि कविसंमेलनाच्या नाव नोंदणीसाठी संपर्क – 9422963655 

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

25 minutes ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

9 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

10 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

23 hours ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

1 day ago

शेतकऱ्याचं जगणं, मरणं आणि मरणानंतरची परवड सांगणारं नाटक : ‘कर्जबळी’

शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…

1 day ago