April 24, 2026
संभाजीनगर येथे आयोजित साक्षात साहित्य कार्यक्रमातील साहित्यिकांचा विचारमंथनाचा प्रसंग
Home » कविता म्हणजे राजकीय कृती ! ‘साक्षात’ कार्यक्रमात रंगली विचारांची ठिणगी
मुक्त संवाद

कविता म्हणजे राजकीय कृती ! ‘साक्षात’ कार्यक्रमात रंगली विचारांची ठिणगी

संभाजीनगर ‘साक्षात’ मधील लक्षवेधी साक्षात वृत्तांत !

आपण डावे आहोत हे पुन्हा पुन्हा सांगायची कवी लेखकाला गरज भासू नये कारण निखळ माणूस म्हणून जगणारा डावाच असतो. आणि छुपा डावा भविष्यात उजवा म्हणूनच उघडा पडत असतो. लेखक कवीला राजकारणाची समज नसेल तर त्याला सांस्कृतिक अंडर करंटही डोळसपणे शोधता येणार नाही. कवीची कविता म्हणजेच राजकीय कृती असते.

अजय कांडर

एखाद्या कार्यक्रमासाठी आपण जातो तेव्हा कार्यक्रम आयोजकांची कार्यक्रमासंदर्भातील शिस्त, त्यांची एकूणच साहित्याची समज निमंत्रित वक्त्यालाही बोलण्याची प्रेरणा देत असते. छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या ‘साक्षात ‘ कार्यक्रमात बोलताना पूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेता आला; याचं कारण या कार्यक्रमाच्या आयोजकांनी दाखवलेल आपलेपण आणि समाज साहित्य राजकारण या अनुषंगाने परखडपणे बोलण्याचे दिलेले स्वातंत्र्य बाकी मी जे काही बोललो ते पुढील काळात कार्यक्रमाचे संयोजक प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील , प्रा. दादा गोरे आणि आणि आमचे मित्र प्रा. रामचंद्र काळुंखे आणि प्रा. हंसराज जाधव यांच्या कल्पनेनुसार एखाद्या नियतकालिकात विस्ताराने प्रसिद्ध होईलच.

मात्र कवी लेखन करतो म्हणजे काय करतो ? कवीची निर्मिती केंद्रे, समकालीन वाड्मयीन संस्कृती, पुरस्कार संस्कृती, साहित्यातील अपप्रवृत्ती, या मुद्यांचा उहापोह केला. आणि कवी लेखकाला लेखन करताना सांस्कृतिक राजकारणच करावं लागतं. साहित्यातील गट तट ही फार संधीसाधू गोष्ट असून जात धर्म हे सगळ नाकारून डावे / उजवे या सगळ्या पलीकडे जाऊन निखळ माणूस म्हणून जगू पाहणारच उत्तम साहित्य निर्मिती करू शकतो.

या संदर्भात आपल्याला कवी पाश याचे उदाहरण देता येईल. त्याच बरोबर आपण डावे आहोत हे पुन्हा पुन्हा सांगायची कवी लेखकाला गरज भासू नये कारण निखळ माणूस म्हणून जगणारा डावाच असतो. आणि छुपा डावा भविष्यात उजवा म्हणूनच उघडा पडत असतो. लेखक कवीला राजकारणाची समज नसेल तर त्याला सांस्कृतिक अंडर करंटही डोळसपणे शोधता येणार नाही.
कवीची कविता म्हणजेच राजकीय कृती असते. करूणेचा धागा बांधन्यासाठीच कविता लिहायची असते. आपला इतिहास आपल्याला नीट माहीत असायला हवा. इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव केळुसकर यांनी त्यांनी लिहिलेले बुद्ध चरित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात ठेवले आणि बाबासाहेब बुद्ध विचाराकडे वळले. या भूमीतून मी लिहितो आहे याचं भान मला सतत असायला हवं.

साहित्यात जातीनुसार, धर्मानुसार, प्रदेशानुसार भक्तांची मांदियाळी वाढली.मात्र कविता प्रांत भाषा धर्म प्रदेश ओलांडून निरंतर वाहत असते असे कथन केले त्याला अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि प्रश्नोत्तराच्या काळात तर ते या सगळ्यावर उत्तम चर्चा झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले गेली तीस वर्ष मराठीतील प्रसिद्ध नाटककार लेखक कवी यांना निमंत्रित करून साक्षात कार्यक्रम केला जातो. मात्र तीस वर्षात हा आजचा कार्यक्रम सर्वाधिक लक्षवेधी ठरला तो आम्ही निमंत्रित केलेल्या वक्त्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन मांडलेल्या विचारांमुळेच ! त्यामुळे आता तीस वर्षांनी हा कार्यक्रम बंद करावा असं वाटत असताना अजून काही काळ हा कार्यक्रम करण्याची उर्मी वाढली आहे.

कार्यक्रमाला कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, रामचंद्र काळुंखे, हंसराज जाधव, यांच्यासह दासू वैद्य, बाबा भांड, शाहू पाटोळे, ऋषिकेश कांबळे, गणेश मोहिते, राहुल कोसंबी, प्रमिला नारायण, सुधाकर शेंडगे, श्रीधर नांदेडकर, कैलास अंभुरे, वाल्मिकी वाघमारे, रवी कोरडे, सुनील उबाळे, जिजा शिंदे, प्रशांत गौतम, गणेश घुले, के एस अतकरे, विशाल तायडे, मनोज खुटे,विष्णू सुराशे, प्रमिला मुखेडकर, प्रिया धारूरकर,हबीब भंडारे, प्रकाश चोरघडे असे अनेक प्रतिष्ठित साहित्यिक उपस्थित होते.

एकंदरीत कणकवली ते संभाजीनगर असा सलग 14 तास प्रवास करून गेलेला वेळ वाया गेला नाही एवढं निश्चित म्हणता येईल!

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

“गोष्ट एका रिटायरमेंटची” एक भावस्पर्शी गोष्ट

World Environment Day : कोकणचा जैवविविधता संवर्धनातूनच विकास

स्व:च्या ओळखीतूनच विश्वाचे ज्ञान

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!