MPKV Rahuri Innovations Accelerate India’s Pulse Production for Self-Sufficiency
गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ व्हावी यासाठी मुख्य पिकात आंतरपीक म्हणून अल्प कालावधीत येणारी कडधान्य पिके — विशेषतः मूग व उडीद — प्रभावी पर्याय म्हणून पुढे आणली. या कडधान्यांच्या मुळांवरील रायझोबियम जीवाणूंच्या गाठी नत्र स्थिरीकरणास मदत करतात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, तसेच सेंद्रिय कर्बवाढीसाठीही हे पीक अत्यंत उपयुक्त ठरते. विद्यापीठाने मोठ्या क्षेत्रांवर प्रात्यक्षिके घेऊन हे मॉडेल शेतकऱ्यांना दाखवून दिले.
डॉ. सुमेरसिंग राजपुत, कडधान्य पैदासकार
संपर्क – 9405138269
शेतकरी वर्गानेही या नव्या पद्धतींचा स्वीकार करत —
— अशा नवकल्पना आत्मसात केल्या. या पद्धतींमुळे जमीन नापीक होण्यापासून संरक्षण मिळाले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ही पिकपद्धती महाराष्ट्राबाहेरही पसरली असून, अनेक राज्यांतील शेतकऱ्यांनी ऊसपिकात कोणतेही रासायनिक खत न वापरता भरघोस उत्पादन मिळवले. रासायनिक खतावरील खर्चही वाचला आणि जमिनीची संरचना सुधारली.
स्वत: केंद्रीय कृषिमंत्र्यांनीही या यशस्वी प्रयोगांची पाहणी करून कौतुक केले. या मॉडेलचे मूळ प्रयोग रब्बी हंगाम 2024 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमोद धोंडे पाटील (सडे, राहुरी) यांच्या शेतावर विद्यापीठाने राबवले होते.
मूग व उडीद ही अल्प खर्चात येणारी, प्रथिनांनी समृद्ध अशी पिके जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असलेली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकरी या पिकांकडे जलद गतीने वळताना दिसतात.
गेल्या दोन वर्षांत —
बाजारातील किंमतीत चढउतार असला तरी उडीद व तूर या कडधान्यांना देशांतर्गत मोठी मागणी असल्याने किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त भावाने खरेदी होते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ सातत्याने संशोधन करून जलद पिकणाऱ्या, कोरडवाहू प्रतिकूल हवामान सहन करणाऱ्या, उच्च उत्पादनक्षम कडधान्यांच्या जाती विकसित करत आहे.
गेल्या चार वर्षांत मूग, उडीद, तूर, चवळी, राजमा, हरभरा या पिकांत विद्यापीठाने विकसित केलेल्या अनेक जातींना केंद्रीय समितीने मान्यता दिली आहे.
IIPR चे प्रकल्प समन्वयक डॉ. आदित्य प्रताप यांनी 12 नोव्हेंबर 2025 च्या ग्रुप मीटिंगमध्ये विद्यापीठाच्या संशोधनाचे विशेष कौतुक केले.
नवनवीन जाती त्वरित आणि पुरेशा प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून विद्यापीठाने —
यांच्यासोबत कायदेशीर समझोते (MOU) करून मूलभूत बियाण्यांपासून मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन प्लॉट्स उभारले. परिणामी, मूग व उडीदाच्या नवीन वाणांचे प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना सहज उपलब्ध झाले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हे सातत्यपूर्ण आणि दूरदृष्टीचे प्रयत्न —
— या सर्व दिशांनी क्रांतिकारी ठरत आहेत. आज महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या नवीन वाणांचा अवलंब करत असून कडधान्याच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे.
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…