संशोधन आणि तंत्रज्ञान

डॉ. क्रांतीवीर मोरे यांची युवा वैज्ञानिक परिषदेसाठी निवड

कोल्हापूर – हरियाणातील पंचकुला येथे येत्या ६ ते ९ डिसेंबर या कालावधीत आयोजित इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल -२०२५ मधील युवा वैज्ञानिक परिषदेसाठी (यंग सायंटिस्ट कॉन्फरन्स) शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. क्रांतीवीर मोरे यांची निवड झाली आहे.

शिवाजी विद्यापीठाचे डॉ. क्रांतीवीर मोरे यांची सौरऊर्जा क्षेत्रातील नॅनोसंशोधन आणि उपकरणनिर्मितीबद्दल इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल 2025 मधील युवा वैज्ञानिक परिषदेसाठी निवड. यावर प्रतिक्रिया

डॉ. मोरे हे सौरऊर्जा क्षेत्राच्या अनुषंगाने संशोधन करीत आहेत. त्यांनी विविध प्रकारची नॅनोसंमिश्रे तयार केली असून त्यांच्यापासून कमीत कमी तापमानामध्ये आणि अत्यल्प वेळेत सौरऊर्जा उत्पादन करणारे उपकरण बनविले आहे. यामध्ये त्यांनी कॅडमियम सल्फाइड क्वांटम डॉट, नैसर्गिक रंग, टायटॅनियम डायऑक्साईड नॅनोमुलद्रव्यांचा वापर केला आहे. हे उपकरण सुलभपणे हाताळता येते. सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधनाला चालना देणाऱ्या या संशोधनामुळेच डॉ. मोरे यांची या परिषदेसाठी निवड झाली आहे.

डॉ. मोरे यांचे वीसहून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित असून सहा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट त्यांच्या नावावर आहेत. त्यांना भारत सरकारकडून कॉपीराईटदेखील प्राप्त झाला आहे. याच वर्षी त्यांनी स्वतःची स्टार्टअप प्रशिक्षण कंपनी स्थापन केली असून विद्यापीठाच्या नवोन्मेष केंद्रात नोंदणी केली आहे.

इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलचे घोषवाक्य “आत्मनिर्भर भारत: विज्ञानातून समृद्धीकडे” असे असून देशातील वैज्ञानिक नवप्रतिभा, सर्जनशीलता यांना एकत्र आणून आंतरविद्याशाखीय संवाद आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहित करण्याचे उद्दिष्ट त्यामागे आहे. परिषदेत नामवंत वैज्ञानिक, नोबेल पुरस्कार विजेते तसेच प्रख्यात वैज्ञानिक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

1 hour ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

13 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago