कोल्हापूर – : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्यांतर्गत रब्बी हंगाम 2024 मध्ये पीक स्पर्धा योजना घेण्यात आली होती. यामध्ये एकूण 83 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्या शेतकऱ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात येतो.

रब्बी 2024 मधील पीकस्पर्धा योजनेचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय निकाल असा –
रब्बी ज्वारी – राज्यस्तर -व्दितीय – राजेंद्र देऊ बन्ने, मु.पो.तारदाळ, ता. हातकणंगले,
जिल्हास्तर- प्रथम केरबा हरी माने, मु.पो.कौलगे, ता. कागल, व्दितीय-संजय केशव पाटील, मु.पो.मौजे तासगांव, ता.हातकणंगले, तृतीय- आप्पासो संभाजी भोसले, मु.पो.केर्ले, ता. करवीर

हरभरा – जिल्हास्तर- प्रथम -निलेश बाबासो उमाजे-मु.पो.अकिवाट, ता. शिरोळ, व्दितीय- जगदीश विलास पाटील, मु.पो.राजापुर, ता. शिरोळ, तृतीय- प्रकाश गणपती कोरे, मु.पो.अब्दुललाट, ता.शिरोळ

गहू – प्रथम- अविनाश विलास मगदूम, मु.पो.घुणकी, ता.हातकणंगले, व्दितीय- सुरेश बाबासो बरगाले, मु.पो.सांगवडे, ता. करवीर, तृतीय- शर्मिला शिवाजी पाटील, मु.पो.भुयेवाडी, ता.करवीर

करडई- जिल्हास्तर-प्रथम- विजय बाबुराव चौगेल, मु.पो.अर्जुनवाड, ता.शिरोळ

तालुकास्तर पुरस्कारासाठी प्रथम क्रमांक 5 हजार, द्वितीय 3 हजार व तृतिय क्रमांक 2 हजार रुपये असे तर, जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक 10 हजार, द्वितीय 7 हजार व तृतीय 5 हजार रुपये तर राज्य पातळी- पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार व तिसरे 30 हजार याप्रमाणे बक्षीस देण्यात येते.

रब्बी 2025 मध्ये होणाऱ्या पीकस्पर्धा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

8 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

20 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago