आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

प्रश्न – सध्याची पावसाची ही स्थिती कश्यामुळे जाणवते ?

माणिकराव खुळे – सध्या कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रासाठी ठोस अशी बळकट वातावरणीय प्रणाली जाणवत नाही. अरबी समुद्रात, महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी दरम्यान तटीय हवेचा कमी दाब पट्ट्यामुळे मुंबईकर्नाटक किनारपट्टी दरम्यान जोरदार पाऊस होत आहे. शिवाय राजस्थान मधील स्ट्रॉंग चक्रीय वाऱ्याच्या प्रणालीमुळे गुजराथ व मध्य प्रदेश मध्ये ही जोरदार पाऊस होत आहे.ह्या तिन्ही ठिकाणच्या जोरदार पावसाच्या प्रेरित परिणामातून नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव येथे सध्या दोन दिवस मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

प्रश्न -सोयाबीन पेरणी संदर्भात कोणता सल्ला द्याल ?

माणिकराव खुळे –  पुढील आठवड्यातही कोकणात जोरदार पावसाची शक्यता ही कायम आहेच. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मात्र  जून महिन्यात म्हणावा असा विशेष अति जोरदार पाऊस अजूनही झालेला नाही. येणाऱ्या आठवड्यात विशेष अश्या जोरदार पावसाची शक्यता जाणवत नाही.   

सध्याची संचित ओल व उत्तम वाफसा सध्या सोयाबीन पेरणी शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे,  पेरणीत चार इंचावर पडणारे सोयाबीनचे बियाणे, सध्याचचा वाहणारा वारा व पडू शकणारे कडक ऊन ह्यामुळे जमीन थरातील सुकणारी वरची खपली आणि बिजांकुरास पडू शकणारे नेट ह्यावर साधारण उतारा मिळेलही, पण त्यानंतर आवश्यक असणाऱ्या पावसाची शक्यता सध्या तरी जाणवत नाही. त्यामुळे बळजबरी केलेली पेरणी कदाचित फसवी ठरु शकते,. कारण अजुन हा जून महिनाच आहे, ह्याचाही विसर पडू नये, असे वाटते.

त्यामुळे २९ जूनच्या आसपास, हवामान अंदाजाचा कानोसा घेऊन कृषी विभागाच्या सल्ल्यासह, जमिनीच्या वरच्या थरात चांगली चिळ-बिळीत ओल आल्यावरच पेरणी करावी. तसाही सोयाबीन पेरणीस अजूनही विशेष उशीर झालेला नाही, असे एकंदरीत वाटते. शेवटी निर्णय आपलाच असावा.

प्रश्न – मका व कपाशीची लागवडी संदर्भात…

माणिकराव खुळे – लागवड झालेल्या व उतरून पडलेल्या मका व कपाशी पिकाला मात्र सिंचन करण्यास हरकत नाही, असे वाटते.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

3 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

4 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

17 hours ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

1 day ago

शेतकऱ्याचं जगणं, मरणं आणि मरणानंतरची परवड सांगणारं नाटक : ‘कर्जबळी’

शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…

1 day ago

महात्मा फुले विचार आणि कार्य या विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा Mahatma Phule Thoughts and Work Poem Competition

राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…

2 days ago