📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 13, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी

A farmer looking at cloudy skies with hope during early monsoon, representing current rainfall and sowing conditions.

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

प्रश्न – सध्याची पावसाची ही स्थिती कश्यामुळे जाणवते ?

माणिकराव खुळे – सध्या कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रासाठी ठोस अशी बळकट वातावरणीय प्रणाली जाणवत नाही. अरबी समुद्रात, महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी दरम्यान तटीय हवेचा कमी दाब पट्ट्यामुळे मुंबई व कर्नाटक किनारपट्टी दरम्यान जोरदार पाऊस होत आहे. शिवाय राजस्थान मधील स्ट्रॉंग चक्रीय वाऱ्याच्या प्रणालीमुळे गुजराथ व मध्य प्रदेश मध्ये ही जोरदार पाऊस होत आहे.ह्या तिन्ही ठिकाणच्या जोरदार पावसाच्या प्रेरित परिणामातून नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव येथे सध्या दोन दिवस मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

प्रश्न -सोयाबीन पेरणी संदर्भात कोणता सल्ला द्याल ?

माणिकराव खुळे –  पुढील आठवड्यातही कोकणात जोरदार पावसाची शक्यता ही कायम आहेच. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मात्र  जून महिन्यात म्हणावा असा विशेष अति जोरदार पाऊस अजूनही झालेला नाही. येणाऱ्या आठवड्यात विशेष अश्या जोरदार पावसाची शक्यता जाणवत नाही.   

सध्याची संचित ओल व उत्तम वाफसा सध्या सोयाबीन पेरणी शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे,  पेरणीत चार इंचावर पडणारे सोयाबीनचे बियाणे, सध्याचचा वाहणारा वारा व पडू शकणारे कडक ऊन ह्यामुळे जमीन थरातील सुकणारी वरची खपली आणि बिजांकुरास पडू शकणारे नेट ह्यावर साधारण उतारा मिळेलही, पण त्यानंतर आवश्यक असणाऱ्या पावसाची शक्यता सध्या तरी जाणवत नाही. त्यामुळे बळजबरी केलेली पेरणी कदाचित फसवी ठरु शकते,. कारण अजुन हा जून महिनाच आहे, ह्याचाही विसर पडू नये, असे वाटते.

त्यामुळे २९ जूनच्या आसपास, हवामान अंदाजाचा कानोसा घेऊन कृषी विभागाच्या सल्ल्यासह, जमिनीच्या वरच्या थरात चांगली चिळ-बिळीत ओल आल्यावरच पेरणी करावी. तसाही सोयाबीन पेरणीस अजूनही विशेष उशीर झालेला नाही, असे एकंदरीत वाटते. शेवटी निर्णय आपलाच असावा.

प्रश्न – मका व कपाशीची लागवडी संदर्भात…

माणिकराव खुळे – लागवड झालेल्या व उतरून पडलेल्या मका व कपाशी पिकाला मात्र सिंचन करण्यास हरकत नाही, असे वाटते.

Related posts

ओल अनमोल आवानओल ग्रंथाविषयी…

आजीची भाजी रानभाजी – मायाळू

मिरची सुधारित लागवड तंत्रज्ञान

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406