काय चाललयं अवतीभवती

साहित्यकणा फाउंडेशनतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

महाराष्ट्रातील उत्कृष्ठ साहित्यकृतीचा गौरव करावा आणि प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने नाशिक येथील साहित्यकणा फाउंडेशन संस्थेने विविध पुरस्कार देण्याचे योजिले आहे, अशी माहिती अध्यक्ष संजय गोराडे यांनी दिली आहे.

कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य या साहित्य प्रकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. कवितासंग्रहासाठी सुमनताई पंचभाई स्मृती पुरस्कार, कथा संग्रहास मीराबाई गोराडे स्मृती पुरस्कार, कादंबरीसाठी शिलाताई गहिलोत-राजपूत पुरस्कार, बालसाहित्यासाठी डॉ. राहुल पाटील स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख रक्कम १००१ रुपये व सन्मान चिन्ह असे या सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे.

ज्या कवी अथवा लेखकांचे ०१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी व बालसाहित्य (कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी) या साहित्य प्रकारात पुस्तक प्रकाशित झालेले आहे अशा कवी अथवा लेखकांकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रकाशित पुस्तकाच्या दोन-दोन प्रती संस्थेच्या पत्त्यावर ०५ जानेवारी २०२३ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन साहित्यकणा फाऊंडेशनने केले आहे.

साहित्य पाठवण्यासाठी पत्ता असा – विलास पंचभाई (सचिव), साइसिद्धी अपार्टमेंट, प्लॅट नं – ५, विनायकनगर, टी. बी. सॅनिटरियमजवळ, देवधर कॉलेज समोर, मेरी, दिंडोरीरोड, नाशिक – ४२२००१. अधिक माहितीसाठी संपर्क – ७७७४९५५८९२

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

7 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

8 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

21 hours ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

1 day ago

शेतकऱ्याचं जगणं, मरणं आणि मरणानंतरची परवड सांगणारं नाटक : ‘कर्जबळी’

शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…

1 day ago

महात्मा फुले विचार आणि कार्य या विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा Mahatma Phule Thoughts and Work Poem Competition

राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…

2 days ago